शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वस्त्रोद्योगात आजही झळकतात ‘कामगार पाहिजेत’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:51 IST

महाराष्ट्र, कामगार दिन विशेष; कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळून आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत

ठळक मुद्देकुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही.आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : नावाजलेल्या सोलापूरच्यावस्त्रोद्योगात मालकांकडून कामाची हमी नसल्याने नेहमीच कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रत्येक कारखान्यासमोर ‘कामगार पाहिजेत’, असे फलक झळकत आहेत.

महागाईचा वेढा सूत, रंग, वीज, पगार, वाहतूक खर्चाबरोबरच इतर उत्पादन खर्चालाही पडला आहे. यामुळे दिवसेंदिवस वस्त्रोद्योग शेतीप्रमाणे आतबट्ट्यातच जात आहे. मंदीच्या नावाखाली मालाला उठाव नसल्याने गरज नसताना मालक कामगारांना सुट्टी देत आहेत. यातून कामाची शाश्वती मिळेना. वस्त्रोद्योग कामगारांच्या पत्नी विडी वळण्याकडे वळल्या आहेत. यामुळे प्रपंच भागविण्याइतपत त्यांना उत्पन्न मिळत आहे. यातून पुरूष मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय नवीन शिकलेल्या पिढींकडे उभारून आठ ते दहा तास श्रम करण्याची मानसिकता नाही.

मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, म्हणून त्यांना उच्च शिक्षित करीत आहेत. शिकलेली मुले हैदराबाद, मुंबई, पुणे व बंगळुरू येथे नोकरीस जात आहेत. त्यातल्या त्यात अल्प शिक्षित मुलेही कमी श्रम असलेल्या चाटी गल्लीसह इतर ठिकाणी नोकरी शोधत आहेत. नजरचुकीने कामगारांकडून फॉल्ट झाला, कांडी तुटली, धोटा गेला तर त्याची नुकसानभरपाई कारखानदार कामगारांकडून वसूल करतात. हा धोकाही कामगारांना नको आहे. शिवाय नोकरी आज आहे, उद्या नाही, अशी स्थिती या उद्योगात आहे. यामुळे कामगार वस्त्रोद्योगातील कामच नको, असे म्हणत आहेत.

कारखानदारांची मुलेही ‘आयटी’त- मंदी, महागाई, विक्री यातील धोका नको म्हणत दस्तुरखुद्द कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळत उच्च शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत. पूर्वी कारखाने असलेल्यांना मुली दिल्या जायच्या. पण आता कारखानदारांऐवजी नोकरदाराला लग्नासाठी अधिकच पसंती देण्यात येत आहे. यामुळे हा धोका पत्करण्याची मानसिकता कारखानदारांच्या मुलांमध्येही नसल्याचे टॉवेल निर्यातदार अशोक संगा यांनी सांगितले.

वस्त्रोद्योगात नवीन कामगार येण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे श्रम करण्याचीही मानसिकता नाही. त्यांना जास्त सवलती हव्या आहेत. ते मिळत नसल्याने त्यांची नाराजी आहे. यामुळे या क्षेत्रात कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.-शेखर गुर्रम, टॉवेल उत्पादक

कुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही. आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत.- राजेश गोसकी,अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगjobनोकरी