शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगात आजही झळकतात ‘कामगार पाहिजेत’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:51 IST

महाराष्ट्र, कामगार दिन विशेष; कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळून आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत

ठळक मुद्देकुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही.आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : नावाजलेल्या सोलापूरच्यावस्त्रोद्योगात मालकांकडून कामाची हमी नसल्याने नेहमीच कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रत्येक कारखान्यासमोर ‘कामगार पाहिजेत’, असे फलक झळकत आहेत.

महागाईचा वेढा सूत, रंग, वीज, पगार, वाहतूक खर्चाबरोबरच इतर उत्पादन खर्चालाही पडला आहे. यामुळे दिवसेंदिवस वस्त्रोद्योग शेतीप्रमाणे आतबट्ट्यातच जात आहे. मंदीच्या नावाखाली मालाला उठाव नसल्याने गरज नसताना मालक कामगारांना सुट्टी देत आहेत. यातून कामाची शाश्वती मिळेना. वस्त्रोद्योग कामगारांच्या पत्नी विडी वळण्याकडे वळल्या आहेत. यामुळे प्रपंच भागविण्याइतपत त्यांना उत्पन्न मिळत आहे. यातून पुरूष मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय नवीन शिकलेल्या पिढींकडे उभारून आठ ते दहा तास श्रम करण्याची मानसिकता नाही.

मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, म्हणून त्यांना उच्च शिक्षित करीत आहेत. शिकलेली मुले हैदराबाद, मुंबई, पुणे व बंगळुरू येथे नोकरीस जात आहेत. त्यातल्या त्यात अल्प शिक्षित मुलेही कमी श्रम असलेल्या चाटी गल्लीसह इतर ठिकाणी नोकरी शोधत आहेत. नजरचुकीने कामगारांकडून फॉल्ट झाला, कांडी तुटली, धोटा गेला तर त्याची नुकसानभरपाई कारखानदार कामगारांकडून वसूल करतात. हा धोकाही कामगारांना नको आहे. शिवाय नोकरी आज आहे, उद्या नाही, अशी स्थिती या उद्योगात आहे. यामुळे कामगार वस्त्रोद्योगातील कामच नको, असे म्हणत आहेत.

कारखानदारांची मुलेही ‘आयटी’त- मंदी, महागाई, विक्री यातील धोका नको म्हणत दस्तुरखुद्द कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळत उच्च शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत. पूर्वी कारखाने असलेल्यांना मुली दिल्या जायच्या. पण आता कारखानदारांऐवजी नोकरदाराला लग्नासाठी अधिकच पसंती देण्यात येत आहे. यामुळे हा धोका पत्करण्याची मानसिकता कारखानदारांच्या मुलांमध्येही नसल्याचे टॉवेल निर्यातदार अशोक संगा यांनी सांगितले.

वस्त्रोद्योगात नवीन कामगार येण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे श्रम करण्याचीही मानसिकता नाही. त्यांना जास्त सवलती हव्या आहेत. ते मिळत नसल्याने त्यांची नाराजी आहे. यामुळे या क्षेत्रात कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.-शेखर गुर्रम, टॉवेल उत्पादक

कुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही. आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत.- राजेश गोसकी,अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगjobनोकरी