शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:50 IST

संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही.सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : उजनीतील पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन केले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयातील पाणी जरी संपले असले तरी चिंचपूर बंधाºयात सोलापूर शहराला २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक असल्याचा अहवाल पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही. सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. उजनी धरणात सध्या १०४ टक्के पाणीसाठा आहे. उजनीतील  उपलब्ध पाण्याचे पुढील दोन वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील वर्षी जरी पाऊस झाला नाही तरी शेतीला आणि पिण्याला पाणी कमी पडू नये असे नियोजन करण्यात आलेले आहे. उजनी भरलेले आहे म्हणून पाणी सोडा असे नसते.  आत्ता असलेल्या पाण्याचे जर नियोजन करून वापर केला तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करत शहराच्या पाणीपुरवठ्याबरोबरच शेतीच्या पाण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले हे सतत संपर्कात आहेत.  मीही रोजच्या रोज पाणीपुरवठ्याची माहिती घेत आहे. त्यामुळे सोलापूर शहराला एक थेंबही पाणी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.औज बंधाºयातील पाणी पातळी जरी शून्यावर गेली असली तरी चिंचपूर बंधाºयात २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक आहे. पालिकेचे अधिकारीही पाण्याचा अपव्यय टाळत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी झटत आहेत. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकळी इंटेकवेल इथे पाच फूट पाणी आहे,तर चिंचपूर बंधाºयाची पातळी  एक मीटर असल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. -----------------------उजनी धरणात १०४ टक्के पाणी असले तरी त्याची उधळपट्टी करणार नाही. किंवा पाण्यासाठी जिल्हा तडफडू देणार नाही. पुढील वर्षी पाऊस झाला नाही तरी पाणी कमी पडणार नाही या पध्दतीने  उजनीतील पाण्याचे नियोजन केले  असून जनतेने विनाकारण पाण्याची उधळपट्टी करु नये. पाणी काटकसरीनेच वापरावे. -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख