शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

१० जानेवारीनंतर उजनीतून शहरासाठी पाणी सोडणार, पालकमंत्री विजयकुमार देशुमख यांची माहिती, उजनीच्या पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:50 IST

संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही.सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : उजनीतील पाण्याचे दोन वर्षांचे नियोजन केले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया औज बंधाºयातील पाणी जरी संपले असले तरी चिंचपूर बंधाºयात सोलापूर शहराला २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक असल्याचा अहवाल पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला शहराला पाणी टंचाई जाणवणार नाही. सिद्धेश्वर गड्डा यात्रेच्या आत उजनीतून सोलापूर शहरासाठी  पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. संभाव्य उन्हाळा लक्षात घेऊन पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. वीस दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी उजनीतून सोडण्यात येणाºया  पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. उजनी धरणात सध्या १०४ टक्के पाणीसाठा आहे. उजनीतील  उपलब्ध पाण्याचे पुढील दोन वर्षांचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील वर्षी जरी पाऊस झाला नाही तरी शेतीला आणि पिण्याला पाणी कमी पडू नये असे नियोजन करण्यात आलेले आहे. उजनी भरलेले आहे म्हणून पाणी सोडा असे नसते.  आत्ता असलेल्या पाण्याचे जर नियोजन करून वापर केला तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करत शहराच्या पाणीपुरवठ्याबरोबरच शेतीच्या पाण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे यासाठी पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले हे सतत संपर्कात आहेत.  मीही रोजच्या रोज पाणीपुरवठ्याची माहिती घेत आहे. त्यामुळे सोलापूर शहराला एक थेंबही पाणी कमी पडू देणार नसल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.औज बंधाºयातील पाणी पातळी जरी शून्यावर गेली असली तरी चिंचपूर बंधाºयात २० जानेवारीपर्यंत पाणी पुरेल इतका साठा शिल्लक आहे. पालिकेचे अधिकारीही पाण्याचा अपव्यय टाळत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी झटत आहेत. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकळी इंटेकवेल इथे पाच फूट पाणी आहे,तर चिंचपूर बंधाºयाची पातळी  एक मीटर असल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे. -----------------------उजनी धरणात १०४ टक्के पाणी असले तरी त्याची उधळपट्टी करणार नाही. किंवा पाण्यासाठी जिल्हा तडफडू देणार नाही. पुढील वर्षी पाऊस झाला नाही तरी पाणी कमी पडणार नाही या पध्दतीने  उजनीतील पाण्याचे नियोजन केले  असून जनतेने विनाकारण पाण्याची उधळपट्टी करु नये. पाणी काटकसरीनेच वापरावे. -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख