शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

‘लोकमत’ चा दणका; बोगस खते, बियाणे विकणाºयांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:31 IST

कृषी मंत्र्यांनी घेतला आढावा; सोयाबीन उगवणीची समितीमार्फत चौकशी

ठळक मुद्देखरीप हंगाम पेरणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे सोलापूर दौºयावर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी बोगस खते व बियाणांवर झालेल्या कारवाईची माहितीकरमाळा तालुक्यात बोगस रायासनिक खत आढळले

सोलापूर : बोगस खते व बियाणे विकणाºया दुकानदारांवर प्रभावी कारवाई करा, असे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिले. याप्रकरणी १६ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून दोघे अटकेत आहेत. मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथे विनापरवाना खत बाळगणाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच पुढे चालू ठेवावी, असे आदेश त्यांनी कृषी अधिकाºयांना दिले.

खरीप हंगाम पेरणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे सोलापूर दौºयावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी बोगस खते व बियाणांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. करमाळा तालुक्यात बोगस रायासनिक खत आढळले. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात २७ टक्के पेरणी झाली आहे. युरियाचा पुरवठा कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे, हा प्रश्न तातडीने सोडविला जाईल. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा कमी असला तरी बार्शी व इतर ठिकाणच्या १0 शेतकºयांनी पेरणी केलेल्या बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली आहे.

कृषी अधिकाºयांच्या समितीमार्फत याचे तातडीने पंचनाम करून चौकशीा अहवाल सादर करा. पुन्हा अशी तक्रार येणार नाही   याबाबत दक्ष रहा व असे बियाणे बाजारात असेल तर त्यावर कारवाई करा असे आदेश कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी कृषी अधिकाºयांना दिले. पीक कर्ज वाटपाचे १ हजार ४३८ कोटीचे उदिष्ट असून आत्तापर्यंत ३५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. १५ जुलैपर्यंत शंभर टक्के उदिष्ठ    साध्य करा अशा सूचना बँक अधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या बँका उदिष्ठ साध्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उप संचालक रवींद्र माने, उपनिंबधक कुंदन भोळे. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे उपस्थित होते.

५६७ कोटींची कर्जमाफीकर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ७८ हजार ३१३ शेतकरी पात्र ठरले, यातील ६८ हजार २६0 शेतकºयांना ५६७ कोटी ४४ लाखाची कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. उर्वरीत शेतकºयांना लाभ दिला जाईल व योजनेतील सर्व शेतकºयांना पीककर्ज तातडीने द्यावे अशा सूचना केल्या आहेत, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.

फळबाग योजना सुरू करणारकोरोना साथीमुळे कृषी योजनांना ब्रेक लागला आहे. पण आता आर्थिक स्थिती पाहून शेतकºयांच्या गरजेच्या फळबाग, ठिबकसिंचन आणि शेततळ्याची योजना सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

मका, हरभरा केंद्राची अडचणमका व हरभरा खरेदी केंद्र सुरू करा अशी शेतकºयांची मागणी असली तरी राज्याचा कोटा संपला आहे. केंद्र शासनाकडून हा कोटा वाढवून मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

अहवालात ‘लोकमत’चे कात्रणकृषी विभागाने बोगस खते व बियाणेबाबत केलेल्या कारवाईबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांना सादर केलेल्या अहवालात ह्यलोकमतह्ण मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण जोडण्यात आले आहे. बोगस खते व बियाणांपासून शेतकºयांची फसवणूक होणार नाही याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी