शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रुप की रानी चोरों का राजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:37 IST

समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य व हेच खरे ऐश्वर्य होय.

ही एक अनोखी प्रेम कहाणी. त्याचे वडील आॅफिसला आले होेते. त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक करुन नेले होते़ त्यास का अटक केली, याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हते. दुपारी कोर्टात या, त्यावेळी तुमच्या मुलाला पोलीस कोर्टात हजर करतील, यावेळी आपल्याला समजेल की, का त्यास अटक केली. दुपारी कोर्टात त्याच्या मुलाला हजर केले. फिर्यादीच्या मुलीला त्याच्या मुलाने पळवून नेल्याचा आरोप होता. ती मुलगी १६ वर्षांची होती. काय प्रकार आहे असे त्यास वारंवार विचारले असता तो गप्प बसत होता. काहीही सांगण्यास तयार नव्हता. त्याचा जामीन अर्ज सेशन्स कोर्टात दाखल केला. त्यावेळी अशा गुन्ह्याबद्दलचा कायदा आजच्या इतका कडक नव्हता. सध्या अशा खटल्यात पोस्को कायदा लावला जातो. त्यामुळे जामीन मिळणे जवळ जवळ अशक्य झाले आहे. पूर्वी आरोपीस अशा खटल्यात शक्यतो जामीन मिळायचाच. यथावकाश आरोपीची जामिनावर मुक्तता झाली. जामिनावर सुटल्यानंतर अतिशय देखणा असलेला तो आरोपी मला भेटायला आॅफिसला आला. अतिशय प्रामाणिक होता तो. त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो एक पाकीटमार आहे. ती मुलगी त्याच्या घराजवळ राहत होती. हा सायकलवरुन जाताना त्यांची नजरा-नजर होत होती. प्रत्येक वेळी तो त्या रस्त्यावरुन जाताना ती गॅलरीमध्ये उभी राहत होती.

एके दिवशी तो जात असताना तिने गॅलरीतून गुलाबाचे फुल खाली टाकले. प्रेमप्रकरणास सुरुवात झाली. हुतात्मा बागेत ते बहरत गेले. एके दिवशी गल्लीतील पोरगा बागेत आला होता. त्याने दोघांना पाहिले. तिच्या घरच्यांना त्याने ताबडतोब जाऊन सांगितले. तिच्यावर बंधन आले. तिचे गॅलरीमध्ये उभे राहणे बंद झाले. एके दिवशी भल्या पहाटे ती त्याच्या घराजवळ आली. दोघांनीही क्षणाचाही विलंब न करता बॉबी स्टाईल धूम ठोकली. सुमारे महिनाभर दोघेही बाहेरच होते. पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत परिश्रम करुन दोघांना शोधून काढले. सध्या मात्र प्रेमीयुगुलांना शोधणे फार सोपे झाले आहे. त्यांचा मोबाईल नंबर ट्रॅकवर लावल्यानंतर एक सेकंदात शोध लागतो आणि लगेच त्या प्रेमीयुगुलांना पकडले जाते.

सध्याच्या मोबाईल युगात प्रेमाची सुरुवात झटपट होते. सकाळी ओळख होते, मोबाईल नंबर घेतला जातो, लगेच मेसेजची सुरुवात होते. दुपारी मेसेज जातो आणि लगेच प्रेमप्रकरण सुरु होते आणि थोड्याच दिवसात मोबाईलची बॅटरी जशी डिस्चार्ज होते तसे प्रेमप्रकरण डिस्चार्ज होऊन जाते ! असो, तो एक अतिशय प्रामाणिक आहे याची मला खात्री झाली. त्याने, तो पाकीटमार आहे असे स्पष्टपणे सांगितले होते. तारखेस न चुकता यायचा. पाकिटमारांच्या दुनियेचे अंतरंग तो मला सांगत होता. कसे आम्ही पाकीट मारतो. नखामध्ये कसे ब्लेड ठेवतो. मी त्यास विचारले एखाद्याच्या खिशात पैसे आहेत ते तू कसे ओळखतो. त्याच्यावर त्याने आकाशाकडे बघितले व वंदन केले. मारलेल्या पाकिटातून पैसे काढून घेऊन महत्वाची कागदपत्रे पाकिटात घालून ज्याचे पाकीट मारले आहे त्यांच्याकडे तो पाठवत असे. 

यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. तिच्या आईवडिलांनी त्याच्याविरुध्द साक्ष दिली. अत्यंत सौंदर्यवान असलेल्या तिने मात्र त्याच्या बाजूने साक्ष दिली. साक्ष देऊन घरी गेल्यानंतर आजपासून तू आम्हाला मेली असे सांगून घरच्यांनी तिची घरातून हकालपट्टी केली. ती तडक त्याच्या घरी आली. त्याच्या घरच्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार केला. दुसºया दिवशी दोघेही मला भेटण्यासाठी आॅफिसला आले. मी तिला विचारले, हा पाकीटमार असून, तू त्याच्यावर कशी भाळली. ती लाजत म्हणाली, सर ये लोगोके पैसे चुराता है, ये मुझे मालूम था, लेकीन इन्होने तो मेरा दिलही चुराया था. मी त्याच्याकडे बघितलं तो म्हणाला, ये तो रुप की रानी है उसनेही मेरा दिल चुराया है! 

अनेक वर्षांनी तो मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यास आला होता. मी म्हणालो, मुलगा काय काम करतो. तो म्हणाला, माझाच वारसा पुढं चालवत आहे. मी म्हणालो म्हणजे? तो म्हणाला, पाकीट का और ये शादी भी मेरे शादी जैसीच! तो अत्यंत समाधानी जीवन जगत होता. जो नेहमी समाधानी असतो तोच खरा श्रीमंत असतो. समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य व हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त तोच जास्त भाग्यवान आणि तो खरा भाग्यवान माझ्यासमोर बसलेला होता. जरी चोर असला तरी! ती लग्नपत्रिका म्हणजे ‘रुप की रानी चोरों का राजा’ चा जणू सिक्वेलच होता !

- अ‍ॅड. धनंजय माने (लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी