शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:59 IST

मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देसाखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून उसाची पहिली उचल कमी करण्याला विरोध करण्यासाठी पुन्हा साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला कर्जमाफीतही शासनाने घोळ घातला असून सहकारमंत्री एक आकडा सांगतात तर मुख्यमंत्री चार हजार कोटींचे कर्जमाफ झाल्याचे सांगतात : खासदार राजू शेट्टीसोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच आहोत असे रविकांत तुपकर यांनी सांगितले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. सोलापूर जिल्हा शेतकरी संघटना कार्यकर्त्यांच्या आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून उसाची पहिली उचल कमी करण्याला विरोध करण्यासाठी पुन्हा साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. आम्ही तर आंदोलन करत आहोतच तुम्ही शेतकºयांनीही कारखानदारांना जाब विचारला पाहिजे असे खा. शेट्टी म्हणाले. कर्जमाफीतही शासनाने घोळ घातला असून सहकारमंत्री एक आकडा सांगतात तर मुख्यमंत्री चार हजार कोटींचे कर्जमाफ झाल्याचे सांगतात. प्रत्यक्षात एकही शेतकरी कर्जमाफ झाल्याचे सांगत नाही असे शेट्टी म्हणाले. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एफ.आर.पी. अधिक ४०० रुपये देण्याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले होते, आम्ही आंदोलन थांबविलेले नाही, पुन्हा ऊसदरासाठी कारखाने बंद पाडू असा इशारा दिला. फसवणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींना हार्दिक पटेलने गुजरातमध्ये घाम आणला होता, सहकार मंत्री देशमुख यांना शेतकºयांचा पोरगा घाम आणल्याशिवाय राहणार नाही असे  तुपकर म्हणाले. जाफरताज पटेल यांनी ७० वर्षांत जे-जे निवडून गेले त्यांनी शेतकºयांवर अन्यायच केला, साखर कारखान्याचे वजनकाटे आॅनलाईन केले नाहीत, सर्वच पक्षाचे कारखानदार पैसे कमविण्यासाठी एकत्र आले, शेतकºयांना भाव मिळावा यासाठी लढले का?, असा सवाल विचारला.  स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल  यांनी कारखान्याचे वजनकाटे तपासणी पथक मॅनेज असल्याचा आरोप केला. साखर कारखान्याचा साखर उतारा अधिक असताना ९ टक्क्यांपर्यंत दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला, यावेळी रणजित बागल यांचेही भाषण झाले. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जालिंदर पाटील, अमोल हिप्परगे, उमाशंकर पाटील, नवनाथ माने, शिवाजी पाटील, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, सचिन पाटील, तानाजी बागल, बबलू गायकवाड, पोपट साठे, वसंत गायकवाड, अनिल पवार आदींसह महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. मंत्रालयात मृत्युमुखी पडलेल्या धर्मा पाटील यांना श्रद्धांजली तर वसंतराव आपटे यांना अभिवादन करण्यात आले. --------------------खासदार राजू शेट्टी म्हणाले...- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पटेल यांनी साखर विक्री व्यवहारावर लक्ष ठेवा असे सांगितले होते.- काँग्रेस-राष्टÑवादीच्या साखर कारखानदारांना  आंदोलन व्हावे असे वाटते कारण सरकारची बदनामी होतेय.- साखर खरेदीदारांच्या मागे का चौकशी लावत नाही?च्साखर व्यवहाराबाबत शासनाच्या भूमिकेबाबतही संशय- हरभरा व तूर विक्री करण्याची घाई शेतकºयांनी करू नये हमीभाव केंद्रावर संपूर्ण विक्री होईल.-------------------------बाजार समितीत संघटना मुसंडी मारेल- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच आहोत असे रविकांत तुपकर यांनी सांगितले होते, खासदार शेट्टी यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मुसंडी मारेल असे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा