शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 12:59 IST

मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देसाखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून उसाची पहिली उचल कमी करण्याला विरोध करण्यासाठी पुन्हा साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला कर्जमाफीतही शासनाने घोळ घातला असून सहकारमंत्री एक आकडा सांगतात तर मुख्यमंत्री चार हजार कोटींचे कर्जमाफ झाल्याचे सांगतात : खासदार राजू शेट्टीसोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच आहोत असे रविकांत तुपकर यांनी सांगितले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. सोलापूर जिल्हा शेतकरी संघटना कार्यकर्त्यांच्या आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करून उसाची पहिली उचल कमी करण्याला विरोध करण्यासाठी पुन्हा साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. आम्ही तर आंदोलन करत आहोतच तुम्ही शेतकºयांनीही कारखानदारांना जाब विचारला पाहिजे असे खा. शेट्टी म्हणाले. कर्जमाफीतही शासनाने घोळ घातला असून सहकारमंत्री एक आकडा सांगतात तर मुख्यमंत्री चार हजार कोटींचे कर्जमाफ झाल्याचे सांगतात. प्रत्यक्षात एकही शेतकरी कर्जमाफ झाल्याचे सांगत नाही असे शेट्टी म्हणाले. शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एफ.आर.पी. अधिक ४०० रुपये देण्याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले होते, आम्ही आंदोलन थांबविलेले नाही, पुन्हा ऊसदरासाठी कारखाने बंद पाडू असा इशारा दिला. फसवणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदींना हार्दिक पटेलने गुजरातमध्ये घाम आणला होता, सहकार मंत्री देशमुख यांना शेतकºयांचा पोरगा घाम आणल्याशिवाय राहणार नाही असे  तुपकर म्हणाले. जाफरताज पटेल यांनी ७० वर्षांत जे-जे निवडून गेले त्यांनी शेतकºयांवर अन्यायच केला, साखर कारखान्याचे वजनकाटे आॅनलाईन केले नाहीत, सर्वच पक्षाचे कारखानदार पैसे कमविण्यासाठी एकत्र आले, शेतकºयांना भाव मिळावा यासाठी लढले का?, असा सवाल विचारला.  स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल  यांनी कारखान्याचे वजनकाटे तपासणी पथक मॅनेज असल्याचा आरोप केला. साखर कारखान्याचा साखर उतारा अधिक असताना ९ टक्क्यांपर्यंत दाखवून दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला, यावेळी रणजित बागल यांचेही भाषण झाले. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जालिंदर पाटील, अमोल हिप्परगे, उमाशंकर पाटील, नवनाथ माने, शिवाजी पाटील, सिद्रामप्पा अब्दुलपूरकर, सचिन पाटील, तानाजी बागल, बबलू गायकवाड, पोपट साठे, वसंत गायकवाड, अनिल पवार आदींसह महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते. मंत्रालयात मृत्युमुखी पडलेल्या धर्मा पाटील यांना श्रद्धांजली तर वसंतराव आपटे यांना अभिवादन करण्यात आले. --------------------खासदार राजू शेट्टी म्हणाले...- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पटेल यांनी साखर विक्री व्यवहारावर लक्ष ठेवा असे सांगितले होते.- काँग्रेस-राष्टÑवादीच्या साखर कारखानदारांना  आंदोलन व्हावे असे वाटते कारण सरकारची बदनामी होतेय.- साखर खरेदीदारांच्या मागे का चौकशी लावत नाही?च्साखर व्यवहाराबाबत शासनाच्या भूमिकेबाबतही संशय- हरभरा व तूर विक्री करण्याची घाई शेतकºयांनी करू नये हमीभाव केंद्रावर संपूर्ण विक्री होईल.-------------------------बाजार समितीत संघटना मुसंडी मारेल- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही लढणारच आहोत असे रविकांत तुपकर यांनी सांगितले होते, खासदार शेट्टी यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत मुसंडी मारेल असे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा