शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

बार्शी तालुक्यातील ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:23 IST

मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली; तुरीचे क्षेत्र टिकून

ठळक मुद्देमृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरीमूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटलीपावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी:  तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे व पुढेही पाऊस पडेल या आशेने तालुक्यातील शेतकºयांनी ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रांवर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली असून, तुरीचे क्षेत्र मात्र टिकून आहे. 

तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी तालुक्यात खरिपाचे उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून खरिपाचे क्षेत्र वाढत आहे़ पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस पडला़  त्यामुळे खरिपाची पेर मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही भागात अद्यापही तुरीची पेरणी होताना दिसत आहे़ आजअखेर तालुक्यात सरासरी १२६़१८  मि़ मी़ एवढा पाऊस पडला आहे़  खरीप हंगामात तुरीच्या सरासरी १२,९३१ हेक्टर क्षेत्रापैकी ११००५(८५ टक्के) म्हणजे सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे़. तर मुगाचे क्षेत्र १६३  वरुन २२१३ (१३५८ टक्के )  हेक्टरवर गेले आहे तर उडदाच्या पेरणीमध्ये देखील वाढ होऊन १,८९२ हे़ वरुन ७४५५हे़(३४२ टक्के) एवढे वाढले आहे़

गेल्या काही वर्षांपासून पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीन व उडदाचे पीक काढून रब्बीची ज्वारी घेता येत असल्याने या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली होती; मात्र मागील वर्षी उडीद व तुरीला दर कमी मिळाल्यामुळे यंदा या दोन्ही पिकासह मुगाची पेरणी ही कमी झाली आहे़ सोयाबीनचे क्षेत्रही यंदा घटले आहे़ 

यंदा पेरणी झालेले व मागील वर्षीचे तुलनात्मक क्षेत्र- तूर -११००५-१४१९९ , मूग १६३- ३०३१ , उडीद  ६४७५- १३९९८, भुईमूग ४१-१४९ , सोयाबीन १९०२८-३३२८७ , कापूस १७३-१५० , मका ७३९-१०५३ , कडवळ,खरीप मक्यासह एकूण चारापिके ८९९- ९०६ हेग़ाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस ६५५५ हे़नवीन लागवड यंदा झाली नाही़  ३३८९ हे़ वर विविध प्रकारची फळपिके आहेत़ सर्व पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने सुरू आहे़ असाच अधूनमधून पाऊस पडत गेल्यास पिके चांगल्या पद्धतीने वाढतील असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

यंदा नवीन उसाची लागवड नाही- गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक एकर देखील नवीन उसाची लागवड झालेली नव्हती; मात्र मागील दोन वर्षांत दमदार पाऊस पडल्यामुळे तालुक्यात ऊस लागवड झाली होती़ मागील वर्षीचाच  तालुक्यातील ६५५५ हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध होणार आहे अत्यल्प क्षेत्रावर कांद्याची रोपे टाकलेली आहेत़ त्यामुळे किती क्षेत्रावर कांदा लागवड होणार हे अद्याप समजू शकले नाही़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी