शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

बार्शी तालुक्यातील ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 14:23 IST

मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली; तुरीचे क्षेत्र टिकून

ठळक मुद्देमृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरीमूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटलीपावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी:  तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे व पुढेही पाऊस पडेल या आशेने तालुक्यातील शेतकºयांनी ३९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रांवर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. मूग, उडीद, सोयाबीनची लागवड घटली असून, तुरीचे क्षेत्र मात्र टिकून आहे. 

तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी तालुक्यात खरिपाचे उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून खरिपाचे क्षेत्र वाढत आहे़ पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र सरासरी एवढा पाऊस पडला़  त्यामुळे खरिपाची पेर मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही भागात अद्यापही तुरीची पेरणी होताना दिसत आहे़ आजअखेर तालुक्यात सरासरी १२६़१८  मि़ मी़ एवढा पाऊस पडला आहे़  खरीप हंगामात तुरीच्या सरासरी १२,९३१ हेक्टर क्षेत्रापैकी ११००५(८५ टक्के) म्हणजे सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे़. तर मुगाचे क्षेत्र १६३  वरुन २२१३ (१३५८ टक्के )  हेक्टरवर गेले आहे तर उडदाच्या पेरणीमध्ये देखील वाढ होऊन १,८९२ हे़ वरुन ७४५५हे़(३४२ टक्के) एवढे वाढले आहे़

गेल्या काही वर्षांपासून पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीन व उडदाचे पीक काढून रब्बीची ज्वारी घेता येत असल्याने या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली होती; मात्र मागील वर्षी उडीद व तुरीला दर कमी मिळाल्यामुळे यंदा या दोन्ही पिकासह मुगाची पेरणी ही कमी झाली आहे़ सोयाबीनचे क्षेत्रही यंदा घटले आहे़ 

यंदा पेरणी झालेले व मागील वर्षीचे तुलनात्मक क्षेत्र- तूर -११००५-१४१९९ , मूग १६३- ३०३१ , उडीद  ६४७५- १३९९८, भुईमूग ४१-१४९ , सोयाबीन १९०२८-३३२८७ , कापूस १७३-१५० , मका ७३९-१०५३ , कडवळ,खरीप मक्यासह एकूण चारापिके ८९९- ९०६ हेग़ाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस ६५५५ हे़नवीन लागवड यंदा झाली नाही़  ३३८९ हे़ वर विविध प्रकारची फळपिके आहेत़ सर्व पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने सुरू आहे़ असाच अधूनमधून पाऊस पडत गेल्यास पिके चांगल्या पद्धतीने वाढतील असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

यंदा नवीन उसाची लागवड नाही- गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक एकर देखील नवीन उसाची लागवड झालेली नव्हती; मात्र मागील दोन वर्षांत दमदार पाऊस पडल्यामुळे तालुक्यात ऊस लागवड झाली होती़ मागील वर्षीचाच  तालुक्यातील ६५५५ हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध होणार आहे अत्यल्प क्षेत्रावर कांद्याची रोपे टाकलेली आहेत़ त्यामुळे किती क्षेत्रावर कांदा लागवड होणार हे अद्याप समजू शकले नाही़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी