शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

केरळ, गुजरात अन् मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील वीजग्राहकांना सवलत हवी

By appasaheb.patil | Updated: November 19, 2020 14:31 IST

वीजग्राहक संघटनेची मागणी- सक्तीने वीजबिल वसुलीचा ग्राहकांनी केला निषेध

ठळक मुद्देराज्यात २ कोटी वीजग्राहक आहेत. या दोन कोटी ग्राहकांच्या वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची गरज ज्याप्रमाणे शेतीपंपाला, यंत्रमागधारकांना सबसिडी देता त्याचप्रमाणे राज्यातील ग्राहकांना वीजबिलात सवलत द्यावी

सोलापूर : कोरोनाकाळातील परिस्थिती ओळखून केरळ, गुजरात अन् मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील वीजग्राहकांचे ५० टक्के वीजबिल माफ केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने २ कोटी वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी ५० टक्के वीजबिल माफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीजग्राहक संघटनेचे प्रमुख प्रताप होगाडे यांनी 'लोकमत' शी बाेलताना व्यक्त केली.

कोरोना महामारीमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे छोटे-मोठे उद्योगधंदे, कंपन्या, कारखाने आदी सर्वकाही बंद करण्यात आले होते. त्यामुळे चार ते पाच महिने अनेकांच्या हाताला काम नव्हते, हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्य मजूर, कामगार ग्राहक आहेत. कोरोनाकाळातील संपूर्ण वीजबिल माफ करावे, यासाठी १३ जुलै रोजी पहिले आंदोलन केले. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २५ ते ३० टक्के वीजबिलात सवलत देऊ, अशी घोषणा केली. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी वीजग्राहक संघटनेने दुसरे आंदोलन करून १०० टक्के वीजबिल माफ करण्याची मागणी केली. २७ ऑक्टोबरला तिसरे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले, त्यावेळी ऊर्जामंत्र्यांनी दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असे सांगितले. मात्र दिवाळीपूर्वी येणारी गोडबातमी न येता सक्तीने बिले वसुली करण्याबाबतचे आदेश देणारी कडूबातमी आल्याचे वीजग्राहक संघटनेने सांगितले. या वसुली करण्याच्या आदेशाने राज्यातील वीजग्राहकांना चांगलाच शॉक लागला आहे. वीजबिल सवलतीच्या आशेवर बसलेल्या ग्राहकांना आता वीजबिल भरावेच लागणार असल्याचे सांगण्यात आले.

२ कोटी ग्राहकांसाठी लागतील साडेचार हजार कोटी

राज्यात २ कोटी वीजग्राहक आहेत. या दोन कोटी ग्राहकांच्या वीजबिलात ५० टक्के सवलत देण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची गरज आहे. ज्याप्रमाणे शेतीपंपाला, यंत्रमागधारकांना सबसिडी देता त्याचप्रमाणे राज्यातील ग्राहकांना वीजबिलात सवलत द्यावी, यासाठी केंद्राकडे मदत मागण्याची गरजच काय, असा सवाल महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणKeralaकेरळGujaratगुजरातMadhya Pradeshमध्य प्रदेश