शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

करमाळयाजवळ पुलावरून जीप कालव्यात कोसळली, तिघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:25 IST

टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ घडली आहे.

ठळक मुद्दे टेभूर्णी ते जातेगाव रस्त्याच्या चौपदरी चे काम रखडलेबोलेरो पुलाचा कठडा तोडून कालव्यात पडलीयाच मार्गावर गेल्या तीन वर्षात १५४ जण अपघातात बळी गेले

सोलापूर / करमाळा :  गोवा येथे  फिरण्यासाठी निघालेली बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून कालव्यात पडल्याने जीप मधील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ घडली आहे. अपघातात ठार झालेले तिघे ही जामनेर जि.जळगाव येथील आहेत.

 शेख फारूक शेख रमजान (वय ५७), तयरीम शेख जफर (वय २०), फरहान शेख एहसान (वय २२) हे अपघातात मरण पावलेले तिघे आहेत.  रमजान ईद चा सण झाल्यानंतर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जामनेर जि.जळगाव येथून गोवा येथे  शेख कुटुंबिय दोन वाहनातून मंगळवारी राञी ९ वा.निघाले होते.

रस्त्यात औरंगाबाद येथे राञी १२ वाजण्याच्या सुमारास जेवन केल्यानंतर अहमदनगरमार्गे निघाले असता पहाटे चारच्या सुमारास करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाचा कठडा तोडून बोलेरो जीप क्र.एम.एच.१९/ ९८५६ कालव्यात पडली व त्या मधील तिघे जागीच ठार झाले. दुस-या वाहनातून निघालेल्यांना अपघाताची माहीती मिळाली नाही ते पुढे पंढरपूर पर्यंत समकाळी ६.३० वा.पर्यंत पोहचले होते. अपघाताची खबर पोलिसांना सकाळी मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.मयत शेख फारूक यांच्या खिशातील मोबाइल घेऊन त्यांनी केलेल्या काँल वर फोन केल्यानंतर अपघाताची माहीती पुढे गेलेल्या नातेवाईकांना समजली.-------------अरूंद रस्त्याचे बळी..टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावरील टेभूर्णी ते जातेगाव रस्त्याच्या चौपदरी चे काम रखडले असून अरूंद रस्ता व पुलाचा अंदाज न आल्याने बोलेरो पुलाचा कठडा तोडून कालव्यात पडली व तिघे ठार झाले. याच मार्गावर गेल्या तीन वर्षात १५४ जण अपघातात बळी गेले आहेत.फोटो

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात