शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारा बार्शीचा जवाहर गणेश मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 11:04 IST

बार्शी शहराला सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक , शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्रांचा मोठा वारसा.

ठळक मुद्देबार्शीच्या गणेशोत्सवाला मोठी परंपराबार्शी शहरामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावनादेखील पूर्वीपासूनचगणेशोत्सव हा एक सामाजिक एकोप्याचा सण

शहाजी फुरडे-पाटीलबार्शी: शहराला सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक , शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्रांचा मोठा वारसा असून, बार्शी शहरामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावनादेखील पूर्वीपासूनच आहे. त्याला कोणीच अपवाद नाही. गणेशोत्सव हा एक सामाजिक एकोप्याचा सण असून, बार्शी शहरात शेकडो गणेश मंडळे वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यामध्ये तब्बल ६० वर्षे जुने असलेल्या भोसले चौकातील जवाहर गणेश तरुण मंडळाने देखाव्याबरोबरच २00 हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतला आहे. 

बार्शीच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, पुण्यानंतर बार्शीतील गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. या ठिकाणी भव्य ऐतिहासिक, सामाजिक व समाजप्रबोधनात्मक देखाव्याची स्पर्धाच लागलेली असते. बार्शी शहरात एकच नव्हे तर अनेक मंडळे उपक्रमशील मंडळे म्हणून पुढे येत आहेत. यामध्ये सोजर क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, योगेश क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, रोडगा रस्त्यावरील गणेश क्रीडा मंडळ, प्रसन्नदाता गणेश मंडळ यासह कितीतरी गणेश मंडळांचा उल्लेख करावा लागेल. 

शहरातील कर्नल भोसले चौकातील राज-विजय क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित जवाहर गणेश तरुण मंडळाची स्थापना ही १९५१ साली चौकातील व्यापाºयांनी एकत्र येऊन केली. २००५ सालापासून चंद्रकांत उर्फ पट्टम पवार यांनी  १२ वर्षांत स्त्रीभ्रूणहत्या, अमरनाथ यात्रा, वैष्णवदेवी यात्रा, अष्टदेवी दर्शन, तंटामुक्त गाव मोहीम, साईबाबा दर्शन, शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मंदिराची प्रतिकृती, आदी देखावे सादर केले. देखाव्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख प्रशासकीय अधिकारी व माजी आ़ राजेंद्र राऊत यांना बोलावले जाते़ 

- मंडळाच्या वतीने केवळ गणेशोत्सवच नव्हे तर दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते. मागील वर्षी पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात बसविण्यात आलेल्या सी़सी़ टी़व्ही़ कॅमेºयासाठी या मंडळाने पंचवीस हजारांची देणगी देऊन भोसले चौकातील कॅमेºयाचा खर्च उचलला आहे़ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बार्शी पोलीस स्टेशनला बेवारस मयत म्हणून नोंद होणाºया किंवा येणाºया मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सर्व जबाबदारी मंडळ गेल्या पाच वर्षांपासून पार पाडत आहे. आजअखेर १५ पेक्षा जास्त मृतदेहांवर मंडळाने अंत्यसंस्कार केले आहेत. 

- माजी आ़ राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राज-विजय मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली व अभिजित राऊत आणि बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या सहकार्याने जवाहर मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली समाधान पाटील, आण्णा वाणी, नागेश लामतुरे, आण्णा सुरवसे, शिवराज खंडेलवाल, पप्पू टेकाळे, निलेश पवार,श्रीकांत राऊत, प्रवीण पवार, अर्जुन टिंंगरे, येडबा कोठावळे, चिंच गॅरेज ग्रुप हे कार्यकर्ते परिश्रम घेतात़ 

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Socialसामाजिक