शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जळगाव, सोलापूरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 06:05 IST

अधिक काळजी घेण्याची गरज : जूनच्या पहिल्या आठवड्यातील स्थिती, राज्यातील ३५ जिल्हे बाधित

सोलापूर : राज्यात सलग दुसऱ्या महिन्यात जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती कायम आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जळगाव आणि सोलापूरचा मृत्यूदर अनुक्रमे ११.३२ आणि ८.६७ राहिला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रसार झाला आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी मृत्यूदर कमी राहील असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर वाढत आहे. मे महिन्यात जळगावचा मृत्यूदर ११.५३ टक्के तर सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर १०.०९ टक्के होता. जूनच्या पहिल्या आठवड्यातच हे दोन्ही जिल्हे दुर्दैवाने टॉपवर आहेत. सोलापूरचा मृत्यूदर दोन टक्क्यांनी कमी झाला आहे. सोलापूरनंतर नाशिक आणि अमरावतीचा मृत्यूनंतर ६.२३ टक्के आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार शनिवारपर्यंत राज्यात सर्वाधिक ४७ हजार ३५४ रुग्ण मुंबईत शहरात आढळून आले. यातील १५७७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईनंतर ठाण्यात १२ हजार ४६४ रुग्ण आढळून आले. यातील ३२२ जणांचा मृत्यू झाला. पुणे तिसºया क्रमांकावर आहे. पुण्यात ९२८९ रुग्ण आढळून आले आणि ४०० जणांचा मृत्यू झाला. मुंबईचा मृत्यूदर ३.३३ टक्के, ठाण्याचा २.५८ टक्के तर पुण्याचा ४.३१ टक्के आहे.सोलापुरात समन्वयाचा अभावसोलापूर शहरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून व्यवस्थित काम झाले नाही. यंत्रणेत अद्यापही समन्वय नाही. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना तत्काळ ताब्यात घेतले जात नाही. क्वॉरंटाईन केंद्रामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण एकाच ठिकाणी राहिले, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.‘या’ जिल्ह्यात एकही मृत्यू नाहीआरोग्य विभागाच्या माहितीनुसार शनिवारी रात्रीपर्यंत सिंधुदुर्ग, हिंगोली, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. येथे एकही मृत्यू झालेला नाही. वर्धा जिल्ह्यात ९ रुग्ण आढळून आले यात एकाचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातही ५३ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई