शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

म्हणायचे होते जवान, बोलून गेले अतिरेकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 17:19 IST

 रावसाहेब दानवें म्हणाले, पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,  आपल्या सैनिकांनी त्यांचे ४०० मारले

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी दानवे सोमवारी सोलापुरात होतेदानवे यांना भारतीय सैनिकांचा उल्लेख करायचा होता. पण बोलायच्या ओघात त्यांच्या तोंडून जवान ऐवजी अतिरेकी हा शब्द निघून गेला

सोलापूर : पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्या बदल्यात आपण त्यांचे ४०० अतिरेकी मारले, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सोलापुरात केले. दानवे यांना भारतीय सैनिकांचा उल्लेख करायचा होता. पण बोलायच्या ओघात त्यांच्या तोंडून जवान ऐवजी अतिरेकी हा शब्द निघून गेला.  

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी दानवे सोमवारी सोलापुरात होते. मेळाव्यात बोलताना  दानवे म्हणाले, या देशातील परिस्थिती एक युध्दजन्य परिस्थिती आहे.

या देशात केव्हा काय होईल. भारत आणि पाकिस्तानचे युध्द आपल्याला शमलेलं वाटत असेल पण ते केव्हा भडकेल हे आजच्या परिस्थितीत सांगता येत नाही. पाकिस्ताने आपल्या देशातील ४० अतिरेकी मारले. देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. आपल्या देशातील ४० अतिरेकी...सैनिक मारले. याचा बदला घेतला पाहिजे, अशी एक भावना आपल्या देशात निर्माण झाली. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शांतपणे विचार केला. तीन दिवसांत आपल्या सैन्यांनी पाकिस्तानात जाउन  ४०० अतिरेकी मारले. 

 दानवे यांच्या वक्तव्याचा एनएसयुआयचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी निषेध केला आहे. भाजपाचे नेते लष्कराच्या बलिदानाचे राजकारण करीत आहेत. भाषणाच्या तोºयात बोलताना दानवे यांना आपण काय बोलतोय हे कळायला हवे होते. त्यांनी माफी तर मागितली नाही. भाजपच्या या मंचावर आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या अशा आमदाराला सोबत घेऊन फिरणे आणि सैनिकांबद्दल पुन्हा अवमानकारक वक्तव्य करणे यातून भाजपाची विकृत मानसिकता दिसून ेयेते. रावसाहेब  दानवे आणि भाजपच्या पदाधिकाºयांचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांनी तत्काळ जनतेची माफी मागावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचा राजीनामा घ्यावा.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान