शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 12:50 IST

रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं; पण तत्पूर्वी ९, १० आणि ११ मे १९३० रोजीच सोलापूर ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालं. ‘ब्रिटिशांचं राज्य गेलं, गांधींचं राज्य आलं’ असं गृह विभागाच्या पुण्यातील अधिकाऱ्यानं हिंदुस्थान सरकारला कळवूनही टाकलं..हे सारं घडलं हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा श्रीकिसन सारडा अन् हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं बलिदान अन् शेकडो सोलापूरकर देशभक्तांच्या लढ्यातून..स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सोलापूरला स्वातंत्र्याची फळं चाखायला दिली. त्यानंतर इंग्रजांनी मार्शल लॉ पुकारला अन् बनावट खटले दाखल करून १२ जानेवारी १९३१ रोजी सोलापूरच्या चार थोर सुपुत्रांना फाशीची शिक्षा दिली.

देशाभिमानी शहर असलेल्या सोलापूरच्या या देदीप्यमान इतिहासाला महात्मा गांधीजींचा मिठाच्या सत्याग्रहाची अन् त्यानंतर गांधीजींच्या अटकेची पार्श्वभूमी आहे. आपल्या महान नेत्याला अटक झाल्याची बातमी ५ मे १९३० रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांच्या या शहरात संतापाची लाट उसळली. सभा, मिरवणुका आणि निदर्शनं सुरू झाली. आशण्णा इराबत्ती, डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर, छन्नुसिंह चंदेले, रामभाऊ राजवाडे आणि महाजन वकील यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. कलेक्टर हेनरी नाईट यांना या सभा पाहून धडकी भरली.

रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली. ही सारी झाडं तोडून टाकली. या घटनेनंतर कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांनी फौजफाट्यासह येऊन ८ ते १० तरुणांना पकडलं; पण त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली. ही नावं जाहीर करावीत, यासाठी तत्कालीन पुढारी मंडळी अन् पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी आताच्या बलिदान चौकात शंकर शिवदारे हा युवक हातात तिरंगा घेऊन कलेक्टरपर्यंत पोहोचला. शेजारी  सार्जंटने शंकरवर गोळी झाडली..भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सोलापूरकराने दिलेलं हे पहिलं बलिदान.

शिवदारेंच्या मृत्यूमुळे जमाव अतिशय संतप्त झाला. ब्रिटिशांच्या पोलिसांनाही जुमानेना; पण त्याचवेळी मल्लप्पा धनशेट्टी यांनी आपल्या एका वाक्यानं जमावाला शांत केलं.. धनशेट्टींचा केवढा हा वचक. ब्रिटिश अधिकारी अन् पोलिसांना हाच वचक सहन झाला नाही. त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला. एका लहान मुलाला गोळी लागली. त्याच्या डोक्याचे अक्षरश: तुकडे झाले..मग जमाव अधिकच संतप्त झाला. त्यानंतर मंगळवार पेठ पोलीस चौकीवर जमावानं हल्ला केला. ब्रिटिशांची पळता भुई थोडी झाली अन् अवघ्या शहरावर सोलापूरकरांचं राज्य प्रस्थापित झालं. त्यानंतर ब्रिटिश सरकार मात्र खडबडून जागं झालं.

१२ मे १९३० रोजी लष्करानं शहराचा ताबा घेतला. १५ मे रोजी अधिकृतपणे मार्शल लॉ लागू झाला, तो ३० जून १९३० पर्यंत होता. या दरम्यानच मल्लप्पा रेवणसिद्ध धनशेट्टी (वय ३२), श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय ३६), जगन्नाथ भगवान शिंदे (वय २४) आणि ‘गझनफर’ कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना ताब्यात घेऊन बनावट पुरावे तयार करून खटला रचण्यात आला. १२ जानेवारी १९३१ रोजी सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचा तो पहिला दिवस होता. 

सोलापूरच्या या अभूतपूर्व इतिहासावर व्यं. गो. अंदूरकर. डॉ. य. दि. फडके. प्रा. रमेश परळकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी विपुल लेखन केलं आहे. सोलापूरच्या या थोर वीरांना शब्दांजली ! - रवींद्र देशमुख, मुख्य उपसंपादक, लोकमत, सोलापूर

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतSolapurसोलापूर