शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

जिल्हा बँक उतरविणार शेतकऱ्यांचा विमा, राजन पाटील यांची माहिती

By admin | Updated: April 18, 2017 18:27 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८: आज स्पर्धेच्या युगात कोणाचेही जीवन सुरक्षित नाही, कुटुंबाचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी विमा गरजेचा असून, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये विम्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी केले.एक्साईड इन्शुरन्स कंपनी व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने बँक इन्स्पेक्टर व बँकेच्या कर्मचाऱ्यांना विमा उतरविण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद््घाटन बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एक्साईड इन्शुरन्स कंपनीने राज्यातील १३ जिल्हा बँकांशी करार केला असून, यामध्ये सोलापूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. शेतकऱ्यांना विमा सेवा देण्यासाठी जिल्हा बँकेने एक्साईड इन्शुरन्स विमा कंपनीशी करार केला असून, बँक आता जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा विमा उतरविणार आहे. आज धावपळीच्या युगात प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. आपण व्यवस्थित वाहन चालवित असलो तरी समोरचा येणारा सरळ जाईलच असे सांगता येत नाही. अशा परिस्थितीतही आपल्याला वेळेवर कामाच्या ठिकाणी जावे लागते. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने विमा उतरविला पाहिजे, असे बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले. विमा कंपनीचे हेमंत कोठारी यांनी आमची विमा कंपनी २००१ पासून या क्षेत्रात काम करत असून, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा उतरविण्यापासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे, सहायक व्यवस्थापक सुभाष भडगावकर, विमा कंपनीचे अमोघ देशपांडे, विकास जाधव, संदीप खोत आदी उपस्थित होते. -----------------खातेदारांसाठीही सुविधाखासगी बँकांच्या स्पर्धेत सोलापूर जिल्हा बँक मागे राहणार नाही, अद्ययावत सुविधा जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये देण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष पाटील म्हणाले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खातेदारांना चांगली सुविधा द्यावी, ठेंवी वाढविण्यावर भर द्यावाच शिवाय लोकांना आपली बँक आहे असे वाटेल असे काम करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.