शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सोयाबीनला चीन, इराणमध्ये नवीन ग्राहक; पाशा पटेल यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:07 IST

बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन ...

ठळक मुद्दे देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यतासोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडलाअमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले

बार्शी : सोयाबीनचे दर हे जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असून अमेरिकेने चीनची सोयाबीन घेण्याचे कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात चीन आपल्या देशातील सोयाबीन खरेदीत उतरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोयाबीनचे दर वाढतील, असा तर्क राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी मांडला.

पाशाभाई पटेल यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट देऊन व्यापाºयांशी संवाद साधला,यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, बाजार समितीचे अध्यक्ष रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर काळदाते, सचिव भरतेश गांधी, ज्येष्ठ व्यापारी मैनुद्दिन तांबोळी, दिलीप गांधी, सचिन बागमार, प्रवीण गायकवाड, सचिन मडके, तुकाराम माने, जितेंद्र माढेकर, देवकीनंदन खटोड, संतोष बोराडे, नवनाथ गपाट, महेश करळे उपस्थित होते.

पाशाभाई पटेल म्हणाले की, आपल्यापेक्षाही मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनचे उत्पादन जास्त होत आहे. मागील वर्षी खाद्य तेलावरील आयात शुल्क चारवेळा वाढविले. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्यास मदत झाली. डॉलर आणि रुपयामधील फरक मोठा असल्यामुळे तफावत होत आहे. त्यामुळे निर्यातीला १0 टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज आहे. आपल्याकडे नॉन जेनेटिक बियाणाची पेरणी केली जाते. आजवर चीन आपले सोयाबीन खरेदी करत नव्हते; मात्र चीनच्या मालाला अमेरिकेने निर्यात ड्युटी वाढवली तर आपल्या देशाची कमी केली आहे.  डिसेंबर महिन्यात सोयाबीन खरेदीसाठी चीनचे शिष्टमंडळ आपल्या देशात येणार आहे. आपल्या देशातील उत्पन्नानुसार आपण केवळ ६0 ते ७0 लाख मे. टन सोयाबीन विकू शकतो. त्यामुळे चीन व त्या जोडीला इराणही आपल्या सोयाबीनसाठी मोठे गिºहाईक असणार आहे. त्यामुळे हे सर्व जुळून आले तर आपल्या देशात सोयाबीनचे दर वाढतील, अशी शक्यताही पटेल यांनी व्यक्त केली.

नियम जपून असावेत- बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल मोठी असून येथील व्यापारीही मोठ्या ताकदीचे आहे. व्यापारी म्हटले की, तेजी-मंदी, शेतमाल खरेदी करणे, साठा करणे हे ओघाने येतेच. काहीवेळा सरकारी नियमामुळे व्यापाºयांना घाबरवले जाते व त्याचा फटका बसून बाजारभाव पडतात. त्यामुळे सरकारचे नियम जपून असावेत, असे पटेल यावेळी म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPasha Patelपाशा पटेलagricultureशेतीFarmerशेतकरी