शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

सीनेत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:21 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सीमेवरील बंधारे टेल टू हेड भरून घेण्याच्या मागणीसाठी नुकतेच वडकबाळ पुलावर ठिय्या आंदोलन ...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सीमेवरील बंधारे टेल टू हेड भरून घेण्याच्या मागणीसाठी नुकतेच वडकबाळ पुलावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची जलसंपदा विभागाने दखल घेतली. सध्या अर्जुनसोंड बंधाऱ्यात पाणी साठवले जात असून, चार दिवसांत खालील बंधारे भरून देण्याची तयारी दर्शवली होती. दोन दिवस अधिकाऱ्यांनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाणी खाली सोडण्यात त्यांना यश येत नाही हे लक्षात येताच सध्याच्या पाणी सोडण्याच्या पद्धतीतच बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

----

...म्हणृून पाणी सोडण्याचा स्रोत बदलला

आधी मोहोळ शाखा कालव्यातून

जलसंपदा विभागाने यापूर्वी मोहोळ शाखा कालव्यातून सीना नदीत पाणी सोडले होते. अर्जुनसोंड बंधारा भरून पाणी पाकणी, शिंगोली, नंदूर हे बंधारे ओलांडून दक्षिण सोलापूर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करणार होते. पाण्याचा प्रवाह अवघा १५० क्युसेकने सुरू होता. आंदोलनानंतर अधिकारी खडबडून जागे झाले, त्यांनी अर्जुनसोंड बंधाऱ्यावर धाव घेतली. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला होता. दरवाजे दीड मीटरपर्यंत उचलून पाणी नदीत सोडण्याचा प्रयत्न करताना परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे चार दिवसांत पाणी वडकबाळ बंधाऱ्यापर्यंत येणे केवळ अशक्य होते. अर्जुनसोंड प्रमाणेच खालील बंधारे भरल्याशिवाय शेतकरी पाणी सोडून देणार नाहीत याची खात्री झाल्याने त्यांनी पाणी सोडण्याचा स्रोत बदलला.

----------

आता कुरुल शाखेतून दुपटीने सोडला

प्रवाह

लवकर बंधारे भरून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कुरुल शाखा कालव्यातून सीना नदीपात्रात पाणी सोडणे सुरू केले. पाण्याचा प्रवाह २७५ क्युसेकने सोडण्यात आला. दुपारपर्यंत पाकणी बंधारा दीड मीटरपर्यंत भरून शिंगोली बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे नदीपात्रातील कोर्सेगावपर्यंतचे सर्वच बंधारे याच पद्धतीने भरून पाणी पुढे प्रवाहित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाढत्या पाणी प्रवाहामुळे कोर्सेगाव बंधाऱ्याच्या वरील एकेक बंधारे भरत टेल टू हेड बंधारे भरण्याच्या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे.

--------

सीना नदीतील बंधारे ‘टेल टू हेड’ भरून घेण्यासाठी आता आमचा प्रयत्न आहे. सकाळीच दुप्पट वेगाने पाणी कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत कसे पोहोचेल याचे नियोजन केले. त्यासाठी किमान ७ दिवसांचा कालावधी लागेल.

- रघुनाथ गायकवाड, उपअभियंता,

भीमा कालवा उपविभाग, सोलापूर विभाग.

-----