शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

By appasaheb.patil | Updated: August 9, 2022 21:38 IST

Nira River: तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

अकलूज - तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरण दरवाजा क्र. ५ साडेचार फुटांनी उचलून नीरा नदीत ४,६३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. पावसाचा जोर वाढल्याने धरण १०० टक्के भरल्यामुळे दु. ४ वा. ९,२७४ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

दरम्यान, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री ८ वाजता वीर धरणातून पुन्हा ९२७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने धरणातुन २४,३८५ क्युसेक व  उजवा कालवा विद्युतगृहातून ९०० क्युसेक, डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक असा एकूण २४,३८५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.यामुळे वीर धरण प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात नीरा खोऱ्यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातून नीरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते. १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने नीरा नदीत पाणी सोडण्याचे बंद केले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून नीरा खोऱ्यात पावसाचे आगमन झाले.

दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे वीर धरणाच्या गेट क्र. ५ मधून ४,६३७ क्युसेक, उजवा कालव्यातील विद्युतगृहातून ९०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युत गृहातून ३०० क्युसेक असा एकूण ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सकाळी ९ वाजता नीरा नदीत सोडला. दुपारी पावसाचे प्रमाण वाढल्याने रात्री ८ वा. पाण्याच्या विसर्गात वाढ करून १३ हजार ९११ क्युसेक पाणी विसर्ग वाढविल्यामुळे दरवाजा क्र.४, ५ व ६ मधून २४,३८५ क्युसेक इतका विसर्ग नीरा नदी सोडला आहे. नीरा नदीच्या काठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर