शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

By appasaheb.patil | Updated: August 9, 2022 21:38 IST

Nira River: तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

अकलूज - तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरण दरवाजा क्र. ५ साडेचार फुटांनी उचलून नीरा नदीत ४,६३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. पावसाचा जोर वाढल्याने धरण १०० टक्के भरल्यामुळे दु. ४ वा. ९,२७४ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

दरम्यान, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री ८ वाजता वीर धरणातून पुन्हा ९२७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने धरणातुन २४,३८५ क्युसेक व  उजवा कालवा विद्युतगृहातून ९०० क्युसेक, डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक असा एकूण २४,३८५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.यामुळे वीर धरण प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात नीरा खोऱ्यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातून नीरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते. १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने नीरा नदीत पाणी सोडण्याचे बंद केले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून नीरा खोऱ्यात पावसाचे आगमन झाले.

दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे वीर धरणाच्या गेट क्र. ५ मधून ४,६३७ क्युसेक, उजवा कालव्यातील विद्युतगृहातून ९०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युत गृहातून ३०० क्युसेक असा एकूण ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सकाळी ९ वाजता नीरा नदीत सोडला. दुपारी पावसाचे प्रमाण वाढल्याने रात्री ८ वा. पाण्याच्या विसर्गात वाढ करून १३ हजार ९११ क्युसेक पाणी विसर्ग वाढविल्यामुळे दरवाजा क्र.४, ५ व ६ मधून २४,३८५ क्युसेक इतका विसर्ग नीरा नदी सोडला आहे. नीरा नदीच्या काठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर