शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदी काठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा

By appasaheb.patil | Updated: August 9, 2022 21:38 IST

Nira River: तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

अकलूज - तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरा खोऱ्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. यामुळे वीर-भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरण दरवाजा क्र. ५ साडेचार फुटांनी उचलून नीरा नदीत ४,६३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. पावसाचा जोर वाढल्याने धरण १०० टक्के भरल्यामुळे दु. ४ वा. ९,२७४ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

दरम्यान, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री ८ वाजता वीर धरणातून पुन्हा ९२७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने धरणातुन २४,३८५ क्युसेक व  उजवा कालवा विद्युतगृहातून ९०० क्युसेक, डावा कालवा विद्युतगृहातून ३०० क्युसेक असा एकूण २४,३८५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.यामुळे वीर धरण प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात नीरा खोऱ्यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातून नीरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते. १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने नीरा नदीत पाणी सोडण्याचे बंद केले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून नीरा खोऱ्यात पावसाचे आगमन झाले.

दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, नीरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे वीर धरणाच्या गेट क्र. ५ मधून ४,६३७ क्युसेक, उजवा कालव्यातील विद्युतगृहातून ९०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युत गृहातून ३०० क्युसेक असा एकूण ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सकाळी ९ वाजता नीरा नदीत सोडला. दुपारी पावसाचे प्रमाण वाढल्याने रात्री ८ वा. पाण्याच्या विसर्गात वाढ करून १३ हजार ९११ क्युसेक पाणी विसर्ग वाढविल्यामुळे दरवाजा क्र.४, ५ व ६ मधून २४,३८५ क्युसेक इतका विसर्ग नीरा नदी सोडला आहे. नीरा नदीच्या काठावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर