शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

परिवर्तनाची सुरुवात सोलापूरपासून करायची आहे, शरद पवार यांचे वक्तत्व,  अकलूजमध्ये रत्नाई महिला वसतिगृहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:27 IST

आपण सगळे एकत्र राहिलो तर निश्चितच सरकार बदलू शकतो. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशाला परिवर्तनाची गरज असून परिवर्तनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून करायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विजयदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनवजा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

ठळक मुद्दे संघटनशील व्यक्तिमत्त्वाच्या शंकररावांनी सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकºयांना मालक बनवण्याचे काम केले

आॅनलाइन लोकमत सोलापूर अकलूज दि ८ : आपण सगळे एकत्र राहिलो तर निश्चितच सरकार बदलू शकतो. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशाला परिवर्तनाची गरज असून परिवर्तनाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून करायची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन विजयदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनवजा आदेशच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजच्या रत्नाई महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभासाठी खा. शरद पवार अकलूज येथे आले असताना बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. दिलीप सोपल, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. हनुमंत डोळस, आ. बबनराव शिंदे, आ. नारायण पाटील, आ. दत्तात्रय सावंत, माजी मंत्री आनंदराव देवकाते, माजी आ. पी. एन. पाटील, राजन पाटील, दीपक साळुंखे, विनायक पाटील, युन्नूस शेख, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, फलटण शुगरचे प्रल्हादराव साळुंखे, बळीरामकाका साठे, कल्याणराव काळे, राजाबापू पाटील, रश्मी बागल, मनोहर सपाटे, सविताराजे भोसले, मंदाताई काळे, महेश गादेकर, चेतन नरोटे, धैर्यशील मोहिते-पाटील, किशोरसिंह माने पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जि.प.सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सरपंच देवश्री मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील, सत्यशिल मोहिते-पाटील उपस्थित होते.पवार म्हणाले की, संघटनशील व्यक्तिमत्त्वाच्या शंकररावांनी सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून शेतकºयांना मालक बनवण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज याच शेतकºयांची अवस्था भाजपा सरकारमुळे दयनीय झालेली आहे. शेतकºयांना कर्जमाफी द्यायची म्हटले की सरकारच्या पोटात दुखायला चालू होते. भाजपाचे सरकार पिकवणाºयापेक्षा खाणाºयांचीच जास्ती काळजी करते, परंतु जर पिकवणाराच जगला नाही तर खाणाºयांचे काय होईल याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. पार्लमेंटमध्ये देशाचे अर्थमंत्री म्हणतात अर्थव्यवस्था सुधारतेय आणि शासनाचा सांख्यिकी विभाग सांगतोय अर्थव्यवस्था घसरतेय. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर शेतीचे अर्थकारण सुधारले पाहिजे. शेतकºयांच्या डोक्यावरील कर्ज कमी झाले पाहिजे, असे सांगितले.माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारीचा पाया सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी रचला. माझ्या राजकीय उमेदीच्या काळात मी अनेकवेळा शंकररावांचा सल्ला घेतला आहे. मी करमाळ्याचा आमदार असताना सकाळी नामदेवराव जगतापांच्या आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या संपर्कात असायचो. तसा आदेशच शरद पवारांनी दिला होता. २००३ साली जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विजयदादा उपमुख्यमंत्री झाले होते. एकाच जिल्ह्याचे दोन नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करण्याची किमया फक्त शरद पवारच करू शकतात. आज आपले पक्ष वेगळे असले तरी आपल्या विचारांचा धागा तुटता कामा नये असे शिंदे म्हणाले. प्रास्ताविक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. आभार जि.प.सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी मानले. -------------------निर्णय आम्ही घेतले...राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काळात १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण, लष्करामध्ये मुलींची भरती, सरकारी नोकरीमध्ये जागा असे महत्त्वाचे निर्णय आम्हीच घेतले आहेत. सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना संधी द्यायला हवी. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी शैक्षणिक संस्था निर्माण करताना हाच विचार केला होता. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढी सक्षमपणे चालवत आहे, असे खा. शरद पवार यांनी सांगितले.-----------------माढा मतदारसंघावर अनेकांचा डोळामाढा मतदारसंघावर अनेक पक्षांचा डोळा आहे, परंतु विजयदादा खंबीर आहेत. दादांनी कोणाला डोळा मारू नये म्हणजे झाले. २०१९ चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी एकत्र येऊन वाद-विवाद, पक्ष-विपक्ष विसरून कामाला लागावे, असे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवार