शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया अयोग्य; शेतकऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

By appasaheb.patil | Updated: November 12, 2022 13:36 IST

राष्ट्रीय महामार्ग ६५२ नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे.

सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग ६५२ नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे. रस्ते कामास विरोध नाही, मात्र बळजबरीने जमिनी घेतल्या जात आहेत, असा आरोप या गावातील शेतकऱ्यांनी आज सोलापुरातील पत्रकार परिषदेत केला.

जवळपास 180 शेतकऱ्यांची 150 एकर जमीन या रस्त्यासाठी बेकायदा पद्धतीने वेळोवेळी ताब्यात घेण्यात आली. शेतकऱ्यांनी कायदेशीर पद्धतीचा मार्ग अवलंब अशी मागणी केली असता त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणला असे आरोप ठेवून पोलिसांच्या मदतीने गुन्हे दाखल करण्यात आले.

गेली पाच वर्षे या विरोधात अक्कलकोट तालुक्यातील तसेच तुळजापूर तालुक्यातील ग्रामस्थ लढा देत आहेत. न्यायालयाने या प्रकरणी लक्ष घातलं शेतकऱ्यां वर अन्याय करू नका असे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सांगितलं. 

तसेच या प्रकरणात सोलापूर आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व्याजासह मिळवून द्यावा असे आदेश दिले आहेत. पण दोन्ही जिल्हाधिकारी ही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शासनकर्ते राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस या सर्वांनी मिळून या गावातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवर एक प्रकारे डल्लाच मारला आहे. न्यायालयाचेही कोणी ऐकत नाही आता न्याय तरी कोणाकडे मागायचा असा सवाल या शेतकऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी दिलीप जोशी सदाशिव ठाकूर, बुद्धी सागर नाईक, नागनाथ बदे तसेच चुंगी आणि हन्नूर चपळगाव परिसरातील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

शासनाचे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन करणारे अधिकारी, मोजणी अधिकारी, पोलीस प्रशासन, भूमी अभिलेख, अधिकारी यापैकी कोणालाही शेतकऱ्यांचा कळवळा नाही. केवळ वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कामकाज उरकणे न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करणं असं सुरू आहे . केवळ शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या चर्चा केल्या जातात प्रत्यक्ष कृती विरोधाभास करणारी आहे न्यायालयाने न्याय जाहीर केला, पण अंमलबजावणी होईना अशी हातबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूर