शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल!

By दिपक दुपारगुडे | Updated: April 21, 2024 19:52 IST

नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

सोलापूर : करमाळा शहरातील रंभापुरा, सुमंतनगर, बागवान नगर, मुलाणवाडा, नागोबा मंदिर भागात पाच दिवसातून एकदाच पिण्याचे पाणी सुटते आणि तेही पंधरा मिनिटेच. आम्ही तहान कशी भागवणार असा संतप्त सवाल सोनाली तांबे, जयश्रीबाई जाधव, कीर्ती चव्हाण या महिलांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केला. पाणी टंचाई भेडसावत असल्याने या महिला हंडे, घागरी घेऊन नगरपालिका गाठत हल्लाबोल केला. पूर्ण दाबाने सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

करमाळा शहराच्या पश्चिम भागात रंभापुरा व परिसरातील भागात सात हजार लोकसंख्या वस्तीचा भाग आहे. या भागात गेल्या चार महिन्यांपासून पाच दिवसाआड एकदाच तेही अवघे पंधरा मिनिटेच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या भागातील नागरिक हे सर्वसामान्य व मजूर कुटुंबातील आहेत. त्यांना दररोज मजुरीने कामावर जावे लागते, पण पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांना कामावरून घरी बसावे लागत आहे.

रंभापुरा भागातील शिंदेसेनेचे विभागप्रमुख नीलेश चव्हाण यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कमलाकर भोज आंदोलनस्थळी आले. तुम्ही आम्हाला पाणी देत नाही... मग बिल कसे काय वसूल करता ? घरपट्टी कशी मागता ? असा संतप्त सवाल करीत रंभापुरा भागास सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास पालिकेच्या कार्यालयास कुलूप ठोकू असा इशारा दिला.

टॅग्स :Solapurसोलापूर