शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

सकाळी घागरी, हंडे घेऊन संतप्त महिलांचा नगरपालिकेवर हल्लाबोल!

By दिपक दुपारगुडे | Updated: April 21, 2024 19:52 IST

नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

सोलापूर : करमाळा शहरातील रंभापुरा, सुमंतनगर, बागवान नगर, मुलाणवाडा, नागोबा मंदिर भागात पाच दिवसातून एकदाच पिण्याचे पाणी सुटते आणि तेही पंधरा मिनिटेच. आम्ही तहान कशी भागवणार असा संतप्त सवाल सोनाली तांबे, जयश्रीबाई जाधव, कीर्ती चव्हाण या महिलांनी पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केला. पाणी टंचाई भेडसावत असल्याने या महिला हंडे, घागरी घेऊन नगरपालिका गाठत हल्लाबोल केला. पूर्ण दाबाने सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

करमाळा शहराच्या पश्चिम भागात रंभापुरा व परिसरातील भागात सात हजार लोकसंख्या वस्तीचा भाग आहे. या भागात गेल्या चार महिन्यांपासून पाच दिवसाआड एकदाच तेही अवघे पंधरा मिनिटेच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. या भागातील नागरिक हे सर्वसामान्य व मजूर कुटुंबातील आहेत. त्यांना दररोज मजुरीने कामावर जावे लागते, पण पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांना कामावरून घरी बसावे लागत आहे.

रंभापुरा भागातील शिंदेसेनेचे विभागप्रमुख नीलेश चव्हाण यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कमलाकर भोज आंदोलनस्थळी आले. तुम्ही आम्हाला पाणी देत नाही... मग बिल कसे काय वसूल करता ? घरपट्टी कशी मागता ? असा संतप्त सवाल करीत रंभापुरा भागास सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास पालिकेच्या कार्यालयास कुलूप ठोकू असा इशारा दिला.

टॅग्स :Solapurसोलापूर