शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सोलापुरात तुरीला उच्चांकी १० हजार ५०० रुपयांचा दर; ४०० क्विंटल आवक 

By दिपक दुपारगुडे | Updated: January 29, 2024 19:08 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे.

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. सोमवारी उच्चांकी हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला आहे. मागील दहा दिवसांपूर्वी १० हजार दोनशे रुपयांचा दर मिळाला होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याप्रमाणे तुरीचीही आवक वाढत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी तुरीचा दर आठ हजारांपर्यंत खाली गेला होता. मात्र, यंदा परतीच्या पावसामुळे तुरीला अळ्या लागल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यंदा तुरीची दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली होती. त्यानुसार मागील महिनाभरापासून तुरीची आवक वाढलेली आहे.

सोमवारी जवळपास ४० गाड्यांची आवक होती. तूरडाळीची मागणी वाढल्यामुळे तुरीच्या दारात वाढ होत आहे. पावसामुळे माल खराब झालेला आहे. त्यामुळे एकरी उतारा कमी निघत आहे; मात्र सध्या मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. सोमवारी झालेल्या लिलावात जवळपास ४०० क्विंटल मालाची आवक होती. त्यात ८६०० ते १०५०० रुपयांपर्यंत दर मिळालेला आहे. सरासरी दर दहा हजारांच्या आसपास असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथील शेतकरी रामचंद्र पोतदार यांच्या पाच पिशव्यांना सर्वाधिक १०,५०० रुपयांचा दर मिळाला आहे. हुडे यांच्याकडून एस.एस. ॲग्रोचे श्रीशैल अंबारे यांनी सर्वाधिक दराने माल खरेदी केली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर