शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

'भाविकाचा मृत्यू नैसर्गिक झाला तरी मदत द्या'; अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी 

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 15, 2024 16:48 IST

अखिल भाविक वारकरी मंडळाचे शिष्टमंडळ भेटले मुख्यमंत्र्यांना.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : केवळ आषाढीच नव्हे, तर इतर तीन वारींनाही महाराष्ट्र शासनाने मदत करावी, वारीत येणाऱ्या भाविकाचा मृत्यू नैसर्गिक झाला तरी त्याला मदत द्यावी आणि एकादशीला व्हीआयपी दर्शन पूर्णत: बंद ठेवावे या तीन प्रमुखसह इतर मागण्या अखिल भाविक वारकरी मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोमवारी केली.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात सुरू असलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन वारीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या मांडत त्याचे निवेदन दिले.

यंदाही वारी संदर्भात मुख्यमंत्री पंढरपूरला पाहणी दौरा करणार असल्याने अक्षय भोसले महाराज यांच्या मदतीने अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे महाराज, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे आदी पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांची ६५ एकर पंढरपूर येथे चर्चा करून वारीसंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अमोल शिंदे, शिवाजी सावंत उपस्थित होते.

या आहेत मागण्या..

१) पंढरपूर येथील ड्रेनेज व गटारी नदीला मिळतात ते बंद करावेत.

२) वारीला येणाऱ्या भाविकांचा मृत्यू नैसर्गिक जरी झाला तरी त्यांना मदत मिळावी.

३) एकादशीला व्हीआयपी दर्शन पूर्ण बंद करावेत.

४) ६५ एकरांमध्ये कुठलेच शिबिर घेऊ नये. ती जागा फक्त वारकरी दिंडीला राखीव असावी.

५) या आषाढीवारीप्रमाणे इतर तीनही वारीला सरकारने मदत करावी.

६) सर्व वारीला नदीमध्ये वाहते पाणी असावे.

७) अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल कायमस्वरुपी असावेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीEknath Shindeएकनाथ शिंदे