शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मुदतवाढ अशक्य; राज्यातील १२ हजार ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:55 IST

ग्रामविकास मंत्री : सरपंच, सदस्यांच्या मुदतवाढीसंदर्भात सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी साधला संवाद

ठळक मुद्देग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता कायद्याच्या बंधनामुळे ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देणे अशक्यघटनेत बदल करून ज्या त्या वेळी निवडणूक घेणे शक्य नसल्यास प्रशासक नेमावेत, असा कायदा झालामुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट

कुर्डूवाडी : राज्यातील मुदत संपणाºया जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त होणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी १५ मे रोजी स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पत्राद्वारे मुदतवाढीची मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील केली होती. त्यावर ग्रामविकास मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.

कोरोना विरोधातील लढ्यात योगदान देऊन सरपंच व सदस्यांनी ग्रामीण महाराष्ट्र सुरक्षित ठेवला़ गावोगावी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत व कर्मचाºयांना घेऊन गावात फवारणी करणे, शिवाय गोरगरिबांना किराणा माल, अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्क वाटप, बाहेरगावातून आलेल्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरण करणे अशी कामे करीत आहेत.

आता तर शहरातील लोक आपल्या मूळगावी येत असल्याने सरपंच व सदस्यांची गरज असताना प्रशासक लागणार म्हणजे ही लढाई सोडून द्यावी लागेल़ अशा परिस्थितीत मुदतवाढ नाही दिली तर २२ मे रोजी सरपंच, उपसरपंच आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण, इतकेच नव्हे तर १ जूनपासून आपापल्या तालुक्यातील पंचायत समितीसमोर साखळी उपोषणाला बसणार आहेत, असे निवेदन मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांना पाठविले होते़ त्यानंतर जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला़ ग्रामविकास मंत्र्यांनी मुदवाढ देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

कायद्यात बदल झाल्याने मुदतवाढ अशक्य- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता कायद्याच्या बंधनामुळे ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देणे अशक्य वाटत असल्याचे सांगितले़ पूर्वी राजकीय सोयीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जायच्या़ मात्र आता घटनेत बदल करून ज्या त्या वेळी निवडणूक घेणे शक्य नसल्यास प्रशासक नेमावेत, असा कायदा झाला़ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत राज्यपालांमार्फत अध्यादेश काढून सरपंचांना दिलासा द्यावा, अशी विनंती केली असता ग्रामविकास मंत्र्यांनी तशीसुद्धा कायद्यात तरतूद ठेवलेली नसल्याचे सांगितले. आमची इच्छा असूनही निर्णय घेता येत नाही असेही ग्रामविकासमंत्री म्हणाले. 

कायदेशीर मुदत संपणाºया प्रकरणातही मुदतीतून लॉकडाऊनचा कालावधी वगळला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालावधी वाढविला होता़ त्यामुळे सरपंच व सदस्यांचा कालावधी सहा महिने वाढविण्यासाठी कायदेशीर अडचण नाही. सध्या प्रशासक नेमण्यास अडचणीचे ठरेल, त्यासाठी शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा.- अ‍ॅड. विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस, राज्य सरपंच परिषद 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफ