शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दिव्यांगाबरोबर लग्न केल्यास मिळेल ५० हजारांचे अनुदान!

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 29, 2023 13:06 IST

दिव्यांग जोडप्यांना समाजकल्याण विभागाचा आधार मिळाला असल्याचे मत दिव्यांग जोडप्यांनी व्यक्त केले.

सोलापूर : दिव्यांग व्यक्तीने सुद्धा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगावे यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांगाशी सामान्य (अव्यंग) व्यक्तीने विवाह केल्यास ५० हजारांचे अनुदान दिले जाते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरजातीय विवाहाच्या धरतीवर दिव्यांग- अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा पात्र लाभार्थ्यांना सुनील खमितकर जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

सुनील खमितकर यांनी दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असे सांगितले. दिव्यांग जोडप्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिव्यांग विभागाचे सच्चिदानंद बांगर, शशिकांत ढेकळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कमलाकर तिकटे, सुरेश भोसले यांनी सहकार्य केले.

जोडप्यांनी मानले आभारदिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागामार्फत दहा दिव्यांग जोडप्यांना प्रत्येक ५० हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. त्यामुळे दिव्यांग जोडप्यांना समाजकल्याण विभागाचा आधार मिळाला असल्याचे मत दिव्यांग जोडप्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :marriageलग्नSolapurसोलापूर