शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

एकमेकांना मदत केल्यास आयुष्यातील संकटे होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:29 IST

आपल्या सभोवतालच्या असलेल्या सजीव-निर्जीव आणि वातावरणास निसर्ग म्हणतात.

आपल्या सभोवतालच्या असलेल्या सजीव-निर्जीव आणि वातावरणासनिसर्ग म्हणतात. मी मागील २२ वर्षांपासून वाइल्ड लाइफ फोटोग्राफी आणि प्रवासाच्या माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यात जातो आहे. आता माझं आणि निसर्गाचं एक सुंदर आणि घट्ट नातं निर्माण झालं आहे. निसर्गात वावरताना अनेक गोष्टी जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. हे करीत असताना निसर्गासमोर माणूस किती छोटा आहे याची वेळोवेळी प्रचिती येते. निसर्गाने मला चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक धडे दिले आहेत यामुळे आता निसर्ग हा माझा गुरु बनला आहे.

अनेक वेळा निसर्गाची निर्मिती कशी झाली असेल, याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे़ लहानपणी आम्हाला सांगितले जायचे की देवाने प्रथम निसर्गाची निर्मिती केली आणि नंतर सजीव निर्माण झाले. देव ॠडऊ म्हणजे ॠ :ॠील्ली१ं३ी ड : डु२ी१५ी२ ऊ :ऊी२३१ङ्म८२ निसर्गाचा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट येते़ येथे प्रत्येक घटकाला स्वत:चे महत्त्व आहे. यातील एक जरी घटक कमी अथवा नाहीसा झाल्यास निसर्गात असमतोल होतो आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात.

निसर्गाने मला अनेक धडे दिले आहेत़ त्यापैकी दोन किस्से आपणासमोर मांडतोय. पहिला किस्सा : जेव्हा मी कोणताही पक्षी किंवा प्राणी यांची दिनचर्या जवळून पाहतो, तेव्हा मला पक्षी / प्राणी दररोज त्यांना जेवढी भूक आणि गरज आहे तेवढेच ताजे अन्न खातात. मी पक्ष्यांना / प्राण्यांना कधी महिनाभराचे अन्न साठविलेले पाहिले नाही. ते अन्न जास्त आहे म्हणून नासाडी करीत नाहीत. यातून मी एका गोष्टीचा बोध घेतला की, आपणास सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी फार कमी अन्न लागते. एक माहिती म्हणून सांगतो की, देवाने आपल्या जठराचा आकार आपल्या मुठीएवढाच दिलेला आहे़ याचा अर्थ आपल्यालासुद्धा जगण्यासाठी दररोज कमी अन्न लागते. साहजिकच आपल्याला अन्न खरेदीसाठी धन लागते. पण हल्ली मनुष्य पुढच्या पिढीसाठी धनसंचय करण्याच्या आणि भौतिक सुखाच्या नादात स्वत: आयुष्यात सुख आणि आनंद लुटणं विसरून गेलाय.

दुसरा किस्सा : काही वर्षांपूर्वी ताडोबा जंगलात फिरताना मला काही अंतरावर एक वाघीण दिसली. त्या वाघिणीचे निरीक्षण करीत असताना काही अंतरावर जाऊन ती झुडपात लपून बसली. याचे कारण शोधताना लक्षात आले की, वाघिणीपासून शंभरेक मीटर अंतरावर ४० ते ५० हरणांचे कळप चरत होते. सर्व हरीण खाण्यात दंग होते. वाघीण दडून बसलेल्या शेजारच्याच झाडावर तीन लंगूर बसले होते. जशी वाघिणीने त्या झुडपातून वेगाने हरणांकडे झेप घेतली तेव्हा झाडावर बसलेल्या लंगुराने जोरात आवाज करीत जंगलात सावधतेचा इशारा दिला. त्याच क्षणी हरणाच्या कळपाने सावध होऊन जंगलात पळ काढला आणि दिसेनासे झाले. लंगुरांच्या इशाºयामुळे त्यांना जीवनदान मिळाले. यातून मी एका गोष्टीचा बोध घेतला की, आपल्या जीवनात प्रत्येक माणसाने जर एकत्रित आणि संघटित राहून एकमेकांना वेळीच मदत / सहाय्य केले तर आपण प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटावर मात करू शकतो.

प्रत्येक वाचकाने वरील मिळालेल्या बोधापासून शिकून ते स्वत:च्या जीवनात अमलात आणल्यास आपले आयुष्य सुखी आणि आनंदी होईल यात शंकाच नाही. निसर्गाने मला दिलेले काही धडे मी पुढील लेखाद्वारे आपणापर्यंत पोहोचवेन. - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ अन् छायाचित्रकार आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरNatureनिसर्गenvironmentवातावरण