शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्याचे देणे वेळेवर दिल्यास केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:53 IST

सरकार कुणालाही वाºयावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आपत्तीग्रस्तांना आश्वासन

सोलापूर : केंद्र सरकारने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही़ केंद्र व राज्य असा दुजाभाव विरोधी पक्षांनी करू नये, कारण एकेकाळी तेही सत्तेवर होते़ राज्य सरकार जे जे शक्य आहे ते करणारच आहे, आपत्तीग्रस्तांना वाºयावर सोडणार नाही असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यकत केले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौºयावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करून शेतकºयांची संवाद साधला़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकºयांची निवेदने स्वीकारली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आताही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे़ सुदैवाने आज उघडीप आहे़ सर्व जनतेला दिलासा देतो आहोत, प्राणहानी होता कामा नये ही आमची भावना आहे़ पाऊस पुन्हा येऊ नये अश्ी माझी प्रार्थना आहे़ मात्र जी परिस्थिती उध्दभवली आहे ती सावरण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही, पंचनामे सुरू आहेत, माहिती घेत आहोत, मदतीला सुरूवातही केली आहे़ आम्ही फक्त माहिती घेत बसणार नाही, आम्ही कुणालाही वाºयावर सोेडणार नाही असेही ते शेवटी म्हणाले़

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूरagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार