शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आळंदी-मोहोळ महामार्गाच्या कामामुळे शेकडो वर्षांपूर्वीचे वृक्ष गेले पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:29 IST

विकासाची वाट, पर्यावरणाचा ºहास; पशू-पक्ष्यांसह शेकडो संसाराची सावली हरपली

ठळक मुद्देमांडवे गाव व तालुक्यातील बहुतांश लोकांकडून या वृक्षतोडीबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.विकासाच्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्यामुळे यासाठी विरोध झाला नाहीवृक्षप्रेमी, संस्था, व्यक्ती व प्रशासनाकडून या महामार्गाचे काम सुरू असतानाच वृक्षलागवड होणे आवश्यक

माळशिरस : आळंदी-मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर मांडवे (ता. माळशिरस) हद्दीत प्रवेश होताच शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेला बोगदा लागताच ५० फाट्याचे नाव आपोआप तोंडी यायचे. मात्र सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे शेकडो वर्षांचे मोठमोठे वृक्ष काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यामुळे या परिसरात विसावणाºया पक्ष्यांच्या घरट्यांबरोबर सावलीत व्यवसाय थाटून संसार चालविणाºया कुटुंबांची सावलीच हरपली आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आळंदी-पंढरपूर- मोहोळ राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. यामुळे या महामार्गावर आधुनिक सुविधांची स्वप्नं गावकºयांनी बघितली. यानंतर सर्व्हे होऊन सध्या कामाला सुरुवात झालेली आहे. मांडवे गावच्या हद्दीत शेकडो वर्षांपूर्वीचे वृक्ष म्हणजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा थांबा होता.

या झाडांच्या गर्द सावलीत रसवंतीगृह, चहा, वडापाव, फळभाज्यांसह विविध लघुउद्योजकांनी आपली दुकाने थाटली होती. या ठिकाणी प्रवास करणारे अनेक वाटसरु थांबून विश्रांती घेत असत. यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार झाला होता. मात्र हे वृक्ष तोडल्यामुळे या वृक्षावरील शेकडो पशू-पक्ष्यांबरोबर आपले संसार चालविणाºया लघुउद्योजकांची सावली हरपली आहे.

मांडवे गाव व तालुक्यातील बहुतांश लोकांकडून या वृक्षतोडीबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. विकासाच्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्यामुळे यासाठी विरोध झाला नाही. याबाबत वृक्षप्रेमी, संस्था, व्यक्ती व प्रशासनाकडून या महामार्गाचे काम सुरू असतानाच वृक्षलागवड होणे आवश्यक आहे.- रितेश पालवे, ग्रामस्थ, मांडवे

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकenvironmentपर्यावरण