शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

माणुसकी जिवंत असल्यानेच कर्फ्यूतही बाबा परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:41 IST

मुलांनी मानले देवाचे आभार; परप्रांतीयांच्या मदतीमुळे गहिवरले चव्हाण कुटुंबीय

ठळक मुद्देसध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहेनागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचलेत्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले

सोलापूर : सध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहे. अशात आपल्या घरातील एखादी व्यक्ती मिसिंग झाल्यास आपली अवस्था काय होईल, हे न सांगितलेले बरे येथील गवळी वस्ती परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय व्यक्ती पाच दिवसांपूर्वी वाट चुकून थेट कर्नाटकात पोहोचली़ विजापूर परिसरात पोहोचल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली़ खाण्या-पिण्याचे वांदे झाले. तिथेही कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता़ त्या व्यक्तीची हतबलता पाहून तेथील पोलीस आणि नागरिकांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली़ त्यानंतर त्यांना सोलापूरचा रस्ता दाखवला़ त्या अज्ञात पोलीस आणि नागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचले अशा भावना व्यक्त करत त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले.

अंबादास विठ्ठलसा चव्हाण, असे या वाट चुकलेल्या व्यक्तीचे नाव आहे़ चव्हाण हे आकाशवाणी केंद्राशेजारील गवळी वस्ती परिसरातील रहिवासी आहेत़ अंबादास चव्हाण हे टेलर आहेत़ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास हे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत़ वडील घरी परतल्यानंतर अंबादास यांचे चिरंजीव रवी आणि धीरज यांचे अश्रू अनावर झाले़ त्यांनी भावूकपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या़ आमचे वडील घरी येण्याकरिता ज्या नागरिकांनी मदत केली ते सर्व देवाचे अवतार असल्याची प्रांजळ भावनाही त्यांनी व्यक्त केली.

शनिवारी दि़ २१ मार्च रोजी पहाटे साडेपाच ते सहा दरम्यान अंबादास नेहमीप्रमाणे वॉकिंगकरिता घराबाहेर पडले़ त्यानंतर त्यांना आपण कुठे चाललो आहोत, याची त्यांना कल्पना आली नाही़ ते थेट विजापूर रस्त्यामार्गे विजापूरकडे निघाले़ वाटेत त्यांना पोलिसांनी थांबवले, ते काहीच बोलले नाहीत़ २२ मार्च रोजी ते विजापूरला पोहोचले़ त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना खायला दिले़ इकडे कशाकरिता आला आहात, असे विचारले असता अंबादास भांबावले़ त्यांना काहीच सुचेना़ सोलापूरहून आलो आहे, असेच सांगत राहिले़ तेथील पोलिसांनी आणि सुज्ञ नागरिकांनी त्यांना सोलापूरचा मार्ग दाखवत घरी जाण्याचा सल्ला दिला़ ते पुन्हा विजापूर मार्गे सोलापूरकडे जाणाºया वाहनांची मदत घेत ते सैफुलपर्यंत पोहोचले़ तेरामैल आणि सोरेगाव परिसरातील नागरिकांनी त्यांना मदत केल्याची माहिती चव्हाण कुटुंबीयांनी लोकमतला दिली़ सैफुल येथील काही नागरिकांनी अंबादास यांच्या घरी फोन करून याबाबत माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी अंबादास यांचे कुटुंबीय सैफुलला जाऊन अंबादास यांना घरी घेऊन आले.

आई म्हणाली...देवानेच माझ्या मुलाला पाठवले- अंबादास हरवल्यानंतर आई प्रेमाबाई आणि वडील विठ्ठलसा हे दोघे फारच चिंतेत होते़ बुधवारी दि़ २५ मार्च रोजी एकाकी त्यांचा मुलगा सैफुलजवळ आहे, असा निरोप मिळाला़ त्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळाला़ सोलापुरात कडक कर्फ्यू आहे़ अशात मुलाला घरी कसे आणायचे याची चिंता त्यांना लागून राहिली़ चव्हाण कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले़ तेथील पोलिसांना त्यांनी सारी हकिकत सांगितली़ पोलिसांनी त्यांना तुम्ही बिनधास्त जा़ गर्दी करून जाऊ नका़ वाटेतील पोलिसांनाही परिस्थिती सांगा ते तुम्हाला सोडतील, असे पोलिसांकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना घरी आणले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस