शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

माणुसकी जिवंत असल्यानेच कर्फ्यूतही बाबा परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 11:41 IST

मुलांनी मानले देवाचे आभार; परप्रांतीयांच्या मदतीमुळे गहिवरले चव्हाण कुटुंबीय

ठळक मुद्देसध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहेनागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचलेत्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले

सोलापूर : सध्या सर्वत्र कडक कर्फ्यू लागू आहे. अशात आपल्या घरातील एखादी व्यक्ती मिसिंग झाल्यास आपली अवस्था काय होईल, हे न सांगितलेले बरे येथील गवळी वस्ती परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास वर्षीय व्यक्ती पाच दिवसांपूर्वी वाट चुकून थेट कर्नाटकात पोहोचली़ विजापूर परिसरात पोहोचल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली़ खाण्या-पिण्याचे वांदे झाले. तिथेही कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता़ त्या व्यक्तीची हतबलता पाहून तेथील पोलीस आणि नागरिकांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली़ त्यानंतर त्यांना सोलापूरचा रस्ता दाखवला़ त्या अज्ञात पोलीस आणि नागरिकांच्या माणुसकीमुळे आमचे बाबा सुखरूप घरी पोहोचले अशा भावना व्यक्त करत त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी साश्रूनयनांनी देवाचे हृदयपूर्वक आभार मानले.

अंबादास विठ्ठलसा चव्हाण, असे या वाट चुकलेल्या व्यक्तीचे नाव आहे़ चव्हाण हे आकाशवाणी केंद्राशेजारील गवळी वस्ती परिसरातील रहिवासी आहेत़ अंबादास चव्हाण हे टेलर आहेत़ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास हे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत़ वडील घरी परतल्यानंतर अंबादास यांचे चिरंजीव रवी आणि धीरज यांचे अश्रू अनावर झाले़ त्यांनी भावूकपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या़ आमचे वडील घरी येण्याकरिता ज्या नागरिकांनी मदत केली ते सर्व देवाचे अवतार असल्याची प्रांजळ भावनाही त्यांनी व्यक्त केली.

शनिवारी दि़ २१ मार्च रोजी पहाटे साडेपाच ते सहा दरम्यान अंबादास नेहमीप्रमाणे वॉकिंगकरिता घराबाहेर पडले़ त्यानंतर त्यांना आपण कुठे चाललो आहोत, याची त्यांना कल्पना आली नाही़ ते थेट विजापूर रस्त्यामार्गे विजापूरकडे निघाले़ वाटेत त्यांना पोलिसांनी थांबवले, ते काहीच बोलले नाहीत़ २२ मार्च रोजी ते विजापूरला पोहोचले़ त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना खायला दिले़ इकडे कशाकरिता आला आहात, असे विचारले असता अंबादास भांबावले़ त्यांना काहीच सुचेना़ सोलापूरहून आलो आहे, असेच सांगत राहिले़ तेथील पोलिसांनी आणि सुज्ञ नागरिकांनी त्यांना सोलापूरचा मार्ग दाखवत घरी जाण्याचा सल्ला दिला़ ते पुन्हा विजापूर मार्गे सोलापूरकडे जाणाºया वाहनांची मदत घेत ते सैफुलपर्यंत पोहोचले़ तेरामैल आणि सोरेगाव परिसरातील नागरिकांनी त्यांना मदत केल्याची माहिती चव्हाण कुटुंबीयांनी लोकमतला दिली़ सैफुल येथील काही नागरिकांनी अंबादास यांच्या घरी फोन करून याबाबत माहिती दिली़ त्यानंतर बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी अंबादास यांचे कुटुंबीय सैफुलला जाऊन अंबादास यांना घरी घेऊन आले.

आई म्हणाली...देवानेच माझ्या मुलाला पाठवले- अंबादास हरवल्यानंतर आई प्रेमाबाई आणि वडील विठ्ठलसा हे दोघे फारच चिंतेत होते़ बुधवारी दि़ २५ मार्च रोजी एकाकी त्यांचा मुलगा सैफुलजवळ आहे, असा निरोप मिळाला़ त्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळाला़ सोलापुरात कडक कर्फ्यू आहे़ अशात मुलाला घरी कसे आणायचे याची चिंता त्यांना लागून राहिली़ चव्हाण कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले़ तेथील पोलिसांना त्यांनी सारी हकिकत सांगितली़ पोलिसांनी त्यांना तुम्ही बिनधास्त जा़ गर्दी करून जाऊ नका़ वाटेतील पोलिसांनाही परिस्थिती सांगा ते तुम्हाला सोडतील, असे पोलिसांकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांना घरी आणले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस