शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हौसेने घर बांधलं... दिवाळीत लग्न लावायचं होतं, पण...; मुलाच्या अपघाती मृत्यूनं वडिलांना दुःख अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 10:57 IST

लॉकडाऊनमुळे कंपनीनं सुट्टी दिल्यानं दोन भाऊ घरी परतत होते; पण अपघातात त्यांचा मृत्यू झाला

केगाव बु. या छोट्याशा गावात विद्युतपंप दुरुस्त करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज आणि अल्पभूधारक शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल या दोघांचा शनिवारी रात्री पुण्यात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दोघांना जड अंत:करणाने मूळगावी स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांना शोक अनावर झाला होता.

जिल्ह्यातील अनेक मुले उच्चशिक्षित झाले की, हाताला काम मिळावे, या हेतूने आई-वडिलांना सोडून कामासाठी पुणे, मुंबई अशा शहरांत जातात. त्यातीलच हे दोन तरुण. पुणे येथे गेले होते. पंकज (वय २७), राहुल (वय २५) हे मागील तीन वर्षांपूर्वी भविष्य घडविण्यासाठी गाव सोडून गेेले. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी जाहीर केली. पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद, मेस बंद, मग या मुलांनी काय करावं? पर्याय एकच, संचारबंदी संपेपर्यंत गावाकडे जाणे. त्यानुसार, शनिवारी पंकज आणि राहुल दोघे दुचाकीवरून गावाकडे निघाले; पण रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.

पंकज हा इरप्पा देसाई यांचा मोठा मुलगा. मुलाचे लग्न करावे म्हणून हौसेने नातेवाइकांच्या मदतीने गावात घर बांधले. फरशीचे काम सुरू होते. दिवाळीत मुलाचे हात पिवळे करण्याच्या आतच पंकज वडिलांना सोडून गेला.

पत्नीनंतर आता मुलगाही गेला, आता कुणाकडे बघून जगावेसिद्धाराम देसाई यांच्या पत्नीचे हृदयविकाराने यापूर्वीच निधन झाले होते. आता ज्याच्याकडे बघून आशेने जगावे, तो मुलगाही गेला. आता कुणासाठी जगावे, अशी भावना सिद्धाराम देसाई यांनी व्यक्त केली.

तरुणाई बेचैनकेगावमधील तरुणांमध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज आणि राहुल या चुलत भावांनी घरच्यांना आणि गावातील काही मित्रांना फोनवरून गावाकडे येत असल्याचे सांगितले होते. आपले मित्र येणार असे वाटत असताना त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच सर्वच दु:खी झाले.

पोलीस कारवाईच्या भीतीने रात्रीच निघालेसंचारबंदीमुळे दिवसा पोलीस कारवाई करतील, या भीतीने रात्रीच ११ वाजून ५० मिनिटांनी काळेवाडीफाटा येथून हे बंधू दुचाकीवरून निघाले. अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डांगे चौकातील एका हॉस्पिटलजवळ येताच त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली अन् हे दोघे जागीच ठार झाले. पंकज हा पेटीएम कंपनीत इंजिनीअर म्हणून होता, तर राहुल हा कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.