शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

हौसेने घर बांधलं... दिवाळीत लग्न लावायचं होतं, पण...; मुलाच्या अपघाती मृत्यूनं वडिलांना दुःख अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 10:57 IST

लॉकडाऊनमुळे कंपनीनं सुट्टी दिल्यानं दोन भाऊ घरी परतत होते; पण अपघातात त्यांचा मृत्यू झाला

केगाव बु. या छोट्याशा गावात विद्युतपंप दुरुस्त करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज आणि अल्पभूधारक शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल या दोघांचा शनिवारी रात्री पुण्यात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दोघांना जड अंत:करणाने मूळगावी स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांना शोक अनावर झाला होता.

जिल्ह्यातील अनेक मुले उच्चशिक्षित झाले की, हाताला काम मिळावे, या हेतूने आई-वडिलांना सोडून कामासाठी पुणे, मुंबई अशा शहरांत जातात. त्यातीलच हे दोन तरुण. पुणे येथे गेले होते. पंकज (वय २७), राहुल (वय २५) हे मागील तीन वर्षांपूर्वी भविष्य घडविण्यासाठी गाव सोडून गेेले. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी जाहीर केली. पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद, मेस बंद, मग या मुलांनी काय करावं? पर्याय एकच, संचारबंदी संपेपर्यंत गावाकडे जाणे. त्यानुसार, शनिवारी पंकज आणि राहुल दोघे दुचाकीवरून गावाकडे निघाले; पण रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.

पंकज हा इरप्पा देसाई यांचा मोठा मुलगा. मुलाचे लग्न करावे म्हणून हौसेने नातेवाइकांच्या मदतीने गावात घर बांधले. फरशीचे काम सुरू होते. दिवाळीत मुलाचे हात पिवळे करण्याच्या आतच पंकज वडिलांना सोडून गेला.

पत्नीनंतर आता मुलगाही गेला, आता कुणाकडे बघून जगावेसिद्धाराम देसाई यांच्या पत्नीचे हृदयविकाराने यापूर्वीच निधन झाले होते. आता ज्याच्याकडे बघून आशेने जगावे, तो मुलगाही गेला. आता कुणासाठी जगावे, अशी भावना सिद्धाराम देसाई यांनी व्यक्त केली.

तरुणाई बेचैनकेगावमधील तरुणांमध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज आणि राहुल या चुलत भावांनी घरच्यांना आणि गावातील काही मित्रांना फोनवरून गावाकडे येत असल्याचे सांगितले होते. आपले मित्र येणार असे वाटत असताना त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच सर्वच दु:खी झाले.

पोलीस कारवाईच्या भीतीने रात्रीच निघालेसंचारबंदीमुळे दिवसा पोलीस कारवाई करतील, या भीतीने रात्रीच ११ वाजून ५० मिनिटांनी काळेवाडीफाटा येथून हे बंधू दुचाकीवरून निघाले. अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डांगे चौकातील एका हॉस्पिटलजवळ येताच त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली अन् हे दोघे जागीच ठार झाले. पंकज हा पेटीएम कंपनीत इंजिनीअर म्हणून होता, तर राहुल हा कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.