शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

हौसेने घर बांधलं... दिवाळीत लग्न लावायचं होतं, पण...; मुलाच्या अपघाती मृत्यूनं वडिलांना दुःख अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 10:57 IST

लॉकडाऊनमुळे कंपनीनं सुट्टी दिल्यानं दोन भाऊ घरी परतत होते; पण अपघातात त्यांचा मृत्यू झाला

केगाव बु. या छोट्याशा गावात विद्युतपंप दुरुस्त करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज आणि अल्पभूधारक शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल या दोघांचा शनिवारी रात्री पुण्यात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दोघांना जड अंत:करणाने मूळगावी स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वांना शोक अनावर झाला होता.

जिल्ह्यातील अनेक मुले उच्चशिक्षित झाले की, हाताला काम मिळावे, या हेतूने आई-वडिलांना सोडून कामासाठी पुणे, मुंबई अशा शहरांत जातात. त्यातीलच हे दोन तरुण. पुणे येथे गेले होते. पंकज (वय २७), राहुल (वय २५) हे मागील तीन वर्षांपूर्वी भविष्य घडविण्यासाठी गाव सोडून गेेले. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी जाहीर केली. पुण्यात काम करणाऱ्या या मुलांना कंपनीने सुट्या दिल्या. कंपनी बंद, मेस बंद, मग या मुलांनी काय करावं? पर्याय एकच, संचारबंदी संपेपर्यंत गावाकडे जाणे. त्यानुसार, शनिवारी पंकज आणि राहुल दोघे दुचाकीवरून गावाकडे निघाले; पण रात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.

पंकज हा इरप्पा देसाई यांचा मोठा मुलगा. मुलाचे लग्न करावे म्हणून हौसेने नातेवाइकांच्या मदतीने गावात घर बांधले. फरशीचे काम सुरू होते. दिवाळीत मुलाचे हात पिवळे करण्याच्या आतच पंकज वडिलांना सोडून गेला.

पत्नीनंतर आता मुलगाही गेला, आता कुणाकडे बघून जगावेसिद्धाराम देसाई यांच्या पत्नीचे हृदयविकाराने यापूर्वीच निधन झाले होते. आता ज्याच्याकडे बघून आशेने जगावे, तो मुलगाही गेला. आता कुणासाठी जगावे, अशी भावना सिद्धाराम देसाई यांनी व्यक्त केली.

तरुणाई बेचैनकेगावमधील तरुणांमध्ये नेहमी मिसळणाऱ्या पंकज आणि राहुल या चुलत भावांनी घरच्यांना आणि गावातील काही मित्रांना फोनवरून गावाकडे येत असल्याचे सांगितले होते. आपले मित्र येणार असे वाटत असताना त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच सर्वच दु:खी झाले.

पोलीस कारवाईच्या भीतीने रात्रीच निघालेसंचारबंदीमुळे दिवसा पोलीस कारवाई करतील, या भीतीने रात्रीच ११ वाजून ५० मिनिटांनी काळेवाडीफाटा येथून हे बंधू दुचाकीवरून निघाले. अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डांगे चौकातील एका हॉस्पिटलजवळ येताच त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली अन् हे दोघे जागीच ठार झाले. पंकज हा पेटीएम कंपनीत इंजिनीअर म्हणून होता, तर राहुल हा कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.