शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 08:30 IST

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम; वसुलीवरही परिणाम, संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान

ठळक मुद्देकलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : कोरोना व्हायरसने देशभर आपली पाळेमुळे पसरली आहेत.  त्याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली़ सर्वच क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला़ असाच एक उद्योग असलेल्या ४० बँका, पतसंस्था, फायनान्स व मल्टीस्टेट यांची पिग्मी (दैनंदिन ठेव) गोळा करणाºया शहर व तालुक्यातील सुमारे ३०० एजंटांना फटका बसला आहे़ या काळात सुमारे चाळीस कोटी रुपये कलेक्शन बुडाले आहे़ 

बार्शी शहर हे सुरुवातीपासूनच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते़ याठिकाणी केवळ शहर व तालुकाच नव्हे तर निम्मा उस्मानाबाद जिल्हा, अहमदनगरचा काही भाग आदी ठिकाणाहून किराणा व इतर माल खरेदीसाठी नागरिक व छोटे-मोठे व्यापारी येतात़ त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते़ बार्शी शहरात १३ पतसंस्था, १५ सहकारी बँका, तीन मल्टीस्टेट सोसायटी, ४ निधी फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा चाळीस पेक्षा जास्त संस्था आहेत़ या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगरकर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे तीनशे एजंटाच्या माध्यमातून कलेक्शन केले जाते.

 कित्येक छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणून देखील रोज शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पिग्मी भरत होते़ तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे़ ते या पिग्मीच्या माध्यमातून बँकांकडे भरत असतात़ कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रावर संकट ओढावले आहे. सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर  हे संकट दूर व्हावे यासाठी गावोगावी प्रार्थना होऊ लागली आहे.

दैनंदिन रोजीरोटीवर परिणाम- सध्या जनता कर्फ्यूपासून हॉस्पिटल, मेडिकल, किराणा व भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद आहेत़ त्यामुळे या हातावरचे पोट असणाºया म्हणजे कलेक्शन केले तरच चार पैसे मिळणारा व एजंट वर्ग अडचणीत आला आहे़ कित्येक एजंटाचे एका दिवसाचे कलेक्शन पाच हजारांपासून वीस ते पन्नास हजारांपर्यंत आहे़ त्यांना काही संस्था दीड टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत कमिशन देतात़ हे कलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली आहे़ त्यामुळे संस्थांचा एनपीए ही वाढण्याचा धोका आहे़ 

सर्व पतसंस्था, बँका, मल्टीस्टेट, फायनान्स यांचे मिळून शहर व तालुक्यात दररोज सव्वा कोटी रुपयापेक्षा जास्त संकलन होत होते; मात्र गेल्या पस्तीस दिवसांपासून बंद असल्यामुळे तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली आहे़ यामुळे संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़ - मिलिंद कांबळे, सरव्यवस्थापक, भगवंत मल्टीस्टेट बार्शी.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस