शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांच्या पिग्मी कलेक्शनला फटका; चाळीस कोटींची बचत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 08:30 IST

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम; वसुलीवरही परिणाम, संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान

ठळक मुद्देकलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : कोरोना व्हायरसने देशभर आपली पाळेमुळे पसरली आहेत.  त्याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनमुळे देशाचीच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली़ सर्वच क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला़ असाच एक उद्योग असलेल्या ४० बँका, पतसंस्था, फायनान्स व मल्टीस्टेट यांची पिग्मी (दैनंदिन ठेव) गोळा करणाºया शहर व तालुक्यातील सुमारे ३०० एजंटांना फटका बसला आहे़ या काळात सुमारे चाळीस कोटी रुपये कलेक्शन बुडाले आहे़ 

बार्शी शहर हे सुरुवातीपासूनच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते़ याठिकाणी केवळ शहर व तालुकाच नव्हे तर निम्मा उस्मानाबाद जिल्हा, अहमदनगरचा काही भाग आदी ठिकाणाहून किराणा व इतर माल खरेदीसाठी नागरिक व छोटे-मोठे व्यापारी येतात़ त्यामुळे शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते़ बार्शी शहरात १३ पतसंस्था, १५ सहकारी बँका, तीन मल्टीस्टेट सोसायटी, ४ निधी फायनान्स व इतर छोटी-मोठी फायनान्स अशा चाळीस पेक्षा जास्त संस्था आहेत़ या संस्थांच्या माध्यमातून कर्जदार व बिगरकर्जदार खातेदारांकडून दररोज सुमारे तीनशे एजंटाच्या माध्यमातून कलेक्शन केले जाते.

 कित्येक छोटे दुकानदार हे आपल्या रोजच्या व्यवसायातून बचत म्हणून देखील रोज शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पिग्मी भरत होते़ तर काही व्यावसायिकांनी खेळते भांडवल म्हणून कर्ज घेतले आहे़ ते या पिग्मीच्या माध्यमातून बँकांकडे भरत असतात़ कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अन्य क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रावर संकट ओढावले आहे. सामान्यजनांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर  हे संकट दूर व्हावे यासाठी गावोगावी प्रार्थना होऊ लागली आहे.

दैनंदिन रोजीरोटीवर परिणाम- सध्या जनता कर्फ्यूपासून हॉस्पिटल, मेडिकल, किराणा व भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद आहेत़ त्यामुळे या हातावरचे पोट असणाºया म्हणजे कलेक्शन केले तरच चार पैसे मिळणारा व एजंट वर्ग अडचणीत आला आहे़ कित्येक एजंटाचे एका दिवसाचे कलेक्शन पाच हजारांपासून वीस ते पन्नास हजारांपर्यंत आहे़ त्यांना काही संस्था दीड टक्क्यापासून ते तीन टक्क्यापर्यंत कमिशन देतात़ हे कलेक्शन थांबल्यामुळे बँकांची कर्जवसुली देखील थांबली आहे़ त्यामुळे संस्थांचा एनपीए ही वाढण्याचा धोका आहे़ 

सर्व पतसंस्था, बँका, मल्टीस्टेट, फायनान्स यांचे मिळून शहर व तालुक्यात दररोज सव्वा कोटी रुपयापेक्षा जास्त संकलन होत होते; मात्र गेल्या पस्तीस दिवसांपासून बंद असल्यामुळे तब्बल ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत ही थांबली आहे़ यामुळे संस्थांबरोबरच एजंटाचेही नुकसान झाले आहे़ - मिलिंद कांबळे, सरव्यवस्थापक, भगवंत मल्टीस्टेट बार्शी.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस