शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

उच्च विचारशक्ती आणि आत्मविश्वास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:28 IST

लोक देश आणि समाजाची अनमोल संपत्ती असतात. म्हणून नेहमी आपले मन मजबूत ठेवा.

 

आपण यापैकी कसे आहात आणि कसे बनू इच्छिता, ते ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. कारण, जीवनात प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, आपण साहसी बनू इच्छिता की भित्रे? सकारात्मक विचार करणारा कधीच भित्रा बनू शकत नाही. कारण, त्याचा स्वत:वर, जीवनावर आणि ईश्वरावर विश्वास असतो. ते उच्च विचारशक्ती आणि आत्मविश्वासाने आपले काम करतात. असे लोक आपल्यासाठी काम करतातच पण त्यांच्यामुळे देश आणि समाजाची प्रगती होत असते. असेच लोक देश आणि समाजाची अनमोल संपत्ती असतात. म्हणून नेहमी आपले मन मजबूत ठेवा. कारण, ए. पी. जे. अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर या महान लोकांनी जन्म घेतला नसता तर एवढे मोठे कर्म त्याच्या हातून झाले नसते.

एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते. एखाद्या क्रिकेटपटूने चांगला खेळ केला तरीही त्याला संघाबाहेर जाण्याचा रस्ता दाखविला जातो. परंतु, तो हार न मानता पुन्हा संघात दाखल होतो. एका महान चित्रपट निर्मात्याच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला दर्शकांनी नकार दिल्यानंतर तो पुन्हा एक चित्रपट निर्माण करतो आणि तो चित्रपट इतिहास घडवितो किंवा मैलाचा दगड ठरतो.असे नेहमीच होते. कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणचे कमजोर मनाचे आणि दुसरे म्हणजे मजबूत मन असलेले. कमजोर मन असणार्‍या लोकांमध्ये संकटाचा सामना करण्याचे धाडस नसते. त्यामुळे ते अधिकधिक कमजोर होऊन तक्रार करणे, रडणे यामुळे अयशस्वी होतात. मात्र आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फोडण्यासाठी कारणे शोधतात.मजबूत मन असणारे लोक असे नसतात. ते प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करतात. टीकाकारांनी केलेली टीका त्यांचे मन बदलू शकत नाही. ते आपली हिंमत गमावत नाहीत, ते तक्रार करत नाहीत. ते प्रत्येक घटनेचा सकारात्मक बाजूने विचार करून एक दिवस यशस्वी होतात. कारण, त्यांच्यामध्ये संकटाच्याकाळी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा असते. ते जीवनातील प्रत्येक आव्हानाचा अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक