शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीची प्रक्रिया सुरू- सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:07 IST

सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एका समितीमध्ये मी सहभागी आहे. ...

ठळक मुद्दे उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवर राहुल गांधींचा प्रभाव असेल - शिंदेनिवडणुकीत फायदा आणि तोट्याचा विचार नसतो - शिंदेसमोर कोणताही उमेदवार असला तरी लढावेच लागेल - शिंदे

सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एका समितीमध्ये मी सहभागी आहे. राजकीय अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून मनसे आणि एमआयएमसारख्या भिन्न विचारसरणीच्या पक्षांनाही एकत्र आणायला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना सुशिलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीशी दोस्ताना करण्याच्या मुद्यावर भाष्य केले. आंबेडकर हे धर्मनिरपेक्ष आहेत. निवडणुका जिंकण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. शिवाय, त्यांना आमच्याबरोबर यायचे आहे आणि आमचीही त्यांना बरोबर घेण्याची भूमिका आहे, असे शिंदे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवर राहुल गांधींचा प्रभाव असेल. माझ्या उमेदवारीचा निर्णयही पक्षश्रेष्ठीच घेतील; पण उमेदवार कोणीही असला तरी मी मात्र फिरतोय. निवडणुकीत फायदा आणि तोट्याचा विचार नसतो. समोर कोणताही उमेदवार असला तरी लढावेच लागेल, असेही एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले.अनौपचारिक गप्पांमध्ये राष्टÑीय प्रश्नांकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.

पावणेपाच वर्षांतील मोदी सरकारच्या काळाकडे एक नागरिक म्हणून आपण कसे पाहता, या प्रश्नावर ते भरभरून बोलले. स्मरणशक्तीला थोडेसे आवाहन करत, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केलेले विधान उद्धृत केले... त्यावेळी मी पत्रकारांना म्हणालो होतो, ‘वेट फॉर थ्रीर इयर्स, इट विल कोलॅप्स’ अगदी तसेच झाले. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. सर्व व्यवस्था कोसळू लागल्या. मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती; पण ती कुठे पूर्ण झालीत? सारीच फसगत. जनता पार्टीच्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. तेव्हा त्या पक्षाने पायात पाय घालून सरकार पाडले. वाजपेयींच्या सत्ताकाळात शायनिंग इंडियाचा नारा दिला; पण देशाची तशी स्थिती नव्हतीच. त्यामुळे मोदी सरकारचीही वाटचाल तशीच राहणार, हे ओळखूनच मी सरकार ‘कोलॅप्स’ होईल, असे म्हणालो होतो, शिंदे सांगत होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेElectionनिवडणूकPoliticsराजकारण