शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
4
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
5
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
6
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
7
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
8
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
9
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
10
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
11
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
12
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
13
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
14
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
15
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
16
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
17
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
18
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
19
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
20
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

अतिवृष्टीचा तडाखा; सोलापूर जिल्ह्यातील ५६५ गावे बाधित, आतापर्यत १४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 3:51 PM

सोलापूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात ...

सोलापूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरे दगावली आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील ४ हजार ७३१ कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा तसेच साखर कारखान्यांचा आसरा घेतला आहे. १६ हजार ९५४ नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील महापुराची भीषणता लक्षात येईल.

जिल्ह्यातील १७९ ठिकाणी वाहतूक सुविधांवर परिणाम झाला आहे. तसेच १३३८ घरांची पडझड झाली असून दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडे महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली आहे.

बुधवारी १४ ऑक्टोंबर रात्रभर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली बाधित गाव पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.रबर रेस्क्यू बोटद्वारे महापुरात अडकलेल्या शेकडो लोकांची सुटका करण्यात आली. याकरिता एनडीआरएफचे जवान तसेच महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान यांच्याकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूर