शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

अतिवृष्टीचा तडाखा; सोलापूर जिल्ह्यातील ५६५ गावे बाधित, आतापर्यत १४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:52 IST

सोलापूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात ...

सोलापूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरे दगावली आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील ४ हजार ७३१ कुटुंबियांनी जिल्हा परिषद शाळा तसेच साखर कारखान्यांचा आसरा घेतला आहे. १६ हजार ९५४ नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील महापुराची भीषणता लक्षात येईल.

जिल्ह्यातील १७९ ठिकाणी वाहतूक सुविधांवर परिणाम झाला आहे. तसेच १३३८ घरांची पडझड झाली असून दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. एकीकडे महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लोकमतला दिली आहे.

बुधवारी १४ ऑक्टोंबर रात्रभर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली बाधित गाव पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. गुरुवारी दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.रबर रेस्क्यू बोटद्वारे महापुरात अडकलेल्या शेकडो लोकांची सुटका करण्यात आली. याकरिता एनडीआरएफचे जवान तसेच महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान यांच्याकडून युद्धपातळीवर मदत कार्य सुरू आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसfloodपूर