शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी योग्य पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:32 IST

छत्रपती संभाजीराजेंची अपेक्षा: आरक्षणाचे राजकारण होता कामा नये

करमाळा : मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मागील सरकारने आरक्षण दिले होते, पण हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता येथून पुढे तरी सरकारने न्यायालयीन लढ्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलावीत, अशी अपेक्षा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करमाळ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली.      

 छत्रपती संभाजीराजे म्हणाले, न्यायालयीन लढ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित बसून चांगल्या पद्धतीची तयारी करून वकिलांची फौज न्यायालयात उभी केली पाहिजे. आरक्षणाचे राजकारण होता कामा नये सत्ताधारी व विरोधक दोघांनी एकत्रित बसून याचा अभ्यास करून न्यायालयीन लढाई लढली तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळेल. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर आम्ही समाधानी असलो तरी मराठा समाजाचे आरक्षण अद्याप मिळत नाही. 

आता मराठा समाजाचा संयम सुटत आलेला आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोघांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे. छत्रपती शाहू महाराजांना आदर्श मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मांडणी केली, आता पत्रकारांनी छत्रपती शाहू महाराजांचा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वारंवार आपल्या लेखणीतून वाचकांपुढे नेला तर निश्चितच समाजात प्रगल्भता येऊन एकमेकांबद्दल प्रेम वाढेल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण