शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

‘तो’ वानर अनेकांचा मित्र झालेला, पण शेवटी केला वृद्धेचा घात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 20:10 IST

अरूण लिगाडे  सांगोला : नर जातीचे हे वानर गावात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी मारुतीचा अवतार म्हणून या त्याच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष ...

ठळक मुद्देफेबु्रवारी महिन्यात या वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होतागेल्या तीन महिन्यांपासून हा नर जातीचा वानर गावात वास्तव्यासवानराला पकडण्यासाठी वन विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून वानराचा बंदोबस्त न झाल्याने कृष्णाबाई सुतार यांचा बळी गेला

अरूण लिगाडे सांगोला : नर जातीचे हे वानर गावात आल्यानंतर सुरुवातीला ग्रामस्थांनी मारुतीचा अवतार म्हणून या त्याच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष केले. अनेक  दिवस याच गावात राहिल्याने तो अनेकांचा मित्र झालेला़ हा माणसाळलेला  वानर असे करेल, असे कोणालाही वाटले नव्हते, पण कोण त्याच्या खोड्या केल्या की तो चावा घ्यायचा, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील घेरडी या गावात बुधवारी घडलेल्या घटनेनंतर या गावात ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली. घडनेमुळे गावकरी सुन्न होते. मात्र माणसाळलेले वानर असे का वागले याचा मात्र गावकºयांना मोठा धक्का बसला आहे.

या वानराच्या संदर्भातील अनेक प्रसंग गावकºयांनी ऐकविले. एकदा गावात आमदार गणपतराव देशमुख यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रम संपेपर्यंत ठाण मांडून होते. तसे पाहिले तर तो माणसाळलेलाही असल्याचे लोक सांगतात, पण लहान मुलांनी त्याची खोडी काढली की तो त्यांच्यावर धावून हाताचा चावा घ्यायचा, असेही ग्रामस्थ सांगतात.

गावानजीक जवाहर विद्यालयातील शालेय मुलांना या वानराचा खूप उपद्रव होऊ लागल्याने मुख्याध्यापकांनी वन विभागास लेखी पत्र देऊन त्याला पकडण्याची विनंती केली होती.

गावात डॉल्बी, स्पीकरचा आवाज आला, अगर ज्या ठिकाणी कार्यक्रम असे त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपेपर्यंत बसून राहायचा़ त्याला संगीताची आवड निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील घंटागाडीच्या सायरनचा आवाज सुरु झाला की तो घंटागाडीवर पटकन जाऊन बसायचा. मग घंटागाडीचे गावातील काम संपले की तो पुन्हा चिंचेच्या झाडाखाली येत असे. 

फेबु्रवारी महिन्यात या वानराला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर ७ मार्च रोजी गोल्डन चौकात दुपारी ३ ते ५ या कालावधीत अंगावर जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याने जाळे हिसकावून पळ काढला. त्यानंतरही वनविभागाचे कर्मचारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु तो अद्याप सापडला नाही, असे सांगण्यात आले.

यांना घेतला वानराने चावा- या नर वानराने गावातील महादेव जगधने, आदिनाथ मणेरी, आबा खताळ, पप्पू कांबळे, सोनाबाई गेजगे, जवाहर विद्यालयातील सारिका गेजगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थ्यांवर हल्ले करून हाताला चावा घेतल्याचे नागेश ककमिरे, जावेद आतार व परमेश्वर गेजगे यांनी सांगितले.

सरपंच, गावातील पुढाºयांनी वन विभागाला या नर वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी लेखी, तोंडी केली होती. परंतु वनविभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे वानराच्या हल्ल्यात माझ्या आईचा बळी गेला आहे. अशी घटनांची वाट न पाहता या वानराला पकडून गाव भयमुक्त करावे़- संतोष सुतार 

सदाभाऊचा बनला मित्र- हा वानर गावातील सदाभाऊ खुळपे यांना मात्र काहीही करत नसे. उलट तो त्यांच्याजवळ जातो. जवळ गेल्यानंतर सदाभाऊ त्याचे अंग टॉवेलने पुसतात, त्याला पिण्यास पाणी देतात, खायला देतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या गोंजारण्यामुळे वानर त्यांचा चांगला मित्रही बनला आहे. मात्र जेव्हा या वानराने गावातील कृष्णाबाई सुतार यांच्यावर हल्ला करून त्या मयत झाल्याचे समजले तेव्हा सदाभाऊंना विश्वासच बसला नाही. 

गेल्या तीन महिन्यांपासून हा नर जातीचा वानर गावात वास्तव्यास आहे. वानराला पकडण्यासाठी वन विभागाला सूचना करूनही त्यांच्याकडून वानराचा बंदोबस्त न झाल्याने कृष्णाबाई सुतार यांचा बळी गेला आहे. वनविभागाने मृताच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत करावी़- कय्युम आत्तार, सरपंच, घेरडी

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात