शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा आवश्यक - सय्यद फजुल्लाह खतीब 

By संताजी शिंदे | Updated: April 22, 2023 13:32 IST

रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते.

सोलापूर : देशात सुख, शांतीबरोबर देशात सर्व धर्मीयांचा एकोपा निर्माण झाला पाहिजे. सर्व धर्म व समाजाने एकमेकांसोबत प्रेमाने राहण्याची गरज आहे, असे झाल्यास देशाचा सर्वांगिन विकास होईल असा संदेश सय्यद फजुल्लाह खतीब सहाब यांनी दिला.

रमजान ईद निमित्त जुनी मिल कंम्पाऊंड येथील आदीलशहा ईदगाह मुस्लिम जमात हनाफिया ट्रस्ट येथे नमाज पठणा दरम्यान मुस्लिम बांधवांना संदेश देत होते. पवित्र कुरान केवळ पुस्तक नसून तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पृथ्वीवरील सर्व मानव जात एका फुलदानीतील फुलाप्रमाणे आहेत, त्यात सर्व फुले असतील तर ती शोभून दिसते. 

तसेच सर्व धर्मीय लोकांचे आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांप्रती आदर, प्रेम भावना ठेवली पाहिजे असे सय्यद फजुल्लाह खतीब सहाब म्हणाले. आदीलशहा ईदगाह येथे सकाळी ८.३० पासून मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत होते. ९.१५ वाजता सर्व बांधव जमा झाले त्यानंतर ९.३० वाजता नमाज पठणाला सुरूवात झाली. १०.२० वाजता नमाज संपली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदगाहतर्फे उत्तम नियोजन- आदीलशहा ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.- नमाजसाठी लहान मुले स्वत:चे वडील व अन्य नातेवाईकांसोबत आले होते. नमाज नंतर लहान मुलेही एकमेकांना शुभेच्छा देत होते.-  पोलिसांनी नवी वेस पोलिस चौकी व नरसिंग गिरजी मिल पासून वाहतूकीचा मार्ग बंद केला होता.

टॅग्स :Solapurसोलापूर