शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; नऊ जनावरांचा मृत्यू, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 08:09 IST

पिंपळखुटे येथील घटना; सारा गाव दहशतीखाली; लस ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्याची मागणी

ठळक मुद्देकुत्र्याने चावा घेतला म्हणून गावातील संबंधित पाच जणांनी पिंपळनेर आरोग्य केंद्र व कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतलीऔषध व इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना एका नेत्याच्या फोनवरून केम (ता. करमाळा) येथील सरकारी दवाखान्यात पाठवले

कुर्डूवाडी: एकीकडे कोरोना व्हायरसच्या धसक्याने सर्वांची झोप उडाली आहे. सर्व सरकारी यंत्रणा त्याविरुद्ध लढत आहे.अशातच पिंपळखुटे येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे. या हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आणि नऊ जनावरांना प्रसाद मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यातच पिसाळलेल्या श्वानावरील लस इथल्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाही म्हणून आरोग्य यंत्रणेने सोलापूरला जायचा सल्ला दिला. लोकांनी मात्र सोलापुरात कोरोना रुग्णांच्या धास्तीनं घरी राहणं पसंत केलं आहे.

पिंपळखुटे येथील एका शेतकºयाची गाय अज्ञात कारणाने मृत्यू पावली. त्यामुळे त्याने तिला ओढत नेऊन उघड्यावरच शेतात टाकली. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या उपाशीपोटी भटक्या कुत्र्यांनी त्यावर ताव मारला अन् सर्व कुत्री क्षणांत पिसाळलेल्या अवस्थेत गावात माणसांबरोबर जनावरांनाही चावा घेत फिरू लागली. हे ज्यावेळेस गावकºयांना समजले तोपर्यंत पाच ग्रामस्थांना,नऊ जनावरांना त्यांनी चावा घेतला होता. यामुळे गावात एकच खळबळ उडाली अन् पिसाळलेल्या सर्व कुत्र्यांना गावकºयांनी मारण्याचे ठरवले. आतापर्यंत १९ पिसाळलेली कुत्री गावकºयांनी मारली  व जाळूनही टाकली आहेत. तोपर्यंत ज्या ज्या जनावरांना ती कुत्री चावली होती त्यातील गाई, म्हशीसह तब्बल नऊ जनावरे मृत्युमुखी पडली.

कुत्र्याने चावा घेतला म्हणून गावातील संबंधित पाच जणांनी पिंपळनेर आरोग्य केंद्र व कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली पण तिथेही त्यावरील औषध व इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना एका नेत्याच्या फोनवरून केम (ता. करमाळा) येथील सरकारी दवाखान्यात पाठवले;  मात्र तिथे डॉक्टरांनी माढा तालुक्यातील रुग्ण आहे म्हणून इंजेक्शने दिली नाहीत. उलट सोलापूरला जाण्याचा सल्ला दिला. प्राथमिक उपचार करून परत पाठवण्यात आले. कोरोनाच्या धसक्याने ते पाचजण प्राथमिक उपचारानंतर अद्याप सोलापूरला पुढील उपचारासाठी जाण्यास तयार नसल्याचे पुढे आले आहे.

संबंधित शेतकºयाने त्याची गाय मृत्यू पावल्यानंतर पुरुन न टाकता उघड्यावर टाकल्याने हा प्रकार घडल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. दोन दिवसांनी वास आल्याने गावातील भटकी कुत्री त्याकडे वळली व ती कुत्री पिसाळलेल्या अवस्थेत गावात फिरू लागली. दिसेल त्याला चावा घेऊ लागली. त्यांनी जनावरांनाही  सोडले नाही. त्यात चावा घेतलेली अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.या घटनेबद्दल आ. संजयमामा शिंदे व झेडपीचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आरोग्य विभागास सूचना देऊनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचे गाºहाणे ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

नागरिक पडले दुहेरी संकटात - गावातील संध्या किशोर भोसले (वय ६),अनिल किसन सुरवसे (वय ४२), आबा येताळ बोडरे (वय ३८), सुरेखा दौंड (वय ५०), अथर्व किशोर मोरे (वय ७) या नागरिकांना व बालकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. याशिवाय रमेश बोराटे यांची जर्सी कालवड, बळीराम बोराटे यांची जर्सी गाय, हनुमंत बोराटे यांची रेडी, आबा बोराटे यांची देशी गाय, संभाजी भोसले यांची म्हैस, उत्तम बोराटे यांच्या दोन शेळ्या व आण्णा बोडरे यांची एक शेळी या सर्व जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यात ते मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे गावातील बहुसंख्य शेतकरी एकीकडे कोरोना व्हायरसमुळे तर दुसरीकडे अशा आपत्कालीन संकटामुळे पुरता भरडला असल्याचे दिसून येत आहे.

कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतला असेल तर त्यावर इंजेक्शन आहे. पण पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास त्यावर जे इंजेक्शन पाहिजे ते येथे नाही. आपण सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवितो. त्याप्रमाणे त्यांंना येथील उपचार  करून पुढे जाण्यास सांगण्यात आले होते.- डॉ. संतोष आडगळे अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdogकुत्रा