शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

साखर कारखानदारीसाठी ‘गुजरात’ पॅटर्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:28 IST

‘गुजरात’प्रमाणेच महाराष्ट्रातही उसाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत देण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर : एकाच वेळी एफआरपीची रक्कम देण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता ‘गुजरात’प्रमाणेच महाराष्ट्रातही उसाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत देण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.शनिवारी राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. साखर दरात होणाºया चढ-उतारामुळे किमान आधारभूत दर देण्यासाठी सर्वच कारखान्यांना शक्य नसल्याने साखर कारखान्यांसमोर अडचणी येत आहेत. मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २२ हजार कोटींपैकी सध्या १७५ कोटी रुपये दिलेले नाहीत, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. एकूण एफआरपीपैकी अवघे ००.८६ टक्के रक्कम शेतकºयांचे देणे असून, ज्यांनी एफआरपी दिली नाही, त्यांना गाळप परवाने दिले जाणार नाहीत, असे देशमुख म्हणाले. गुजरातमध्ये उसाचे पैसे शेतकºयांना दोन-तीन टप्प्यांत दिले जातात, राज्यात एकाच टप्प्यांत पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे उपलब्ध होत नाहीत. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार एफआरपीची रक्कम एकाच टप्प्यात व ऊस गाळपाला आणल्यानंतर १४ दिवसांंत देणे बंधनकारक आहे. ही अडचण लक्षात घेऊन राज्यातही उसाचे पैसे देण्यासाठी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. मागील वर्षीची शिल्लक साखर व यावर्षीचे उत्पादन पाहता कारखान्यांना थेट इथेनॉल निर्मिती करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. इथेनॉल विक्रीचे वाढलेले दर लक्षात घेऊन कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले.दरम्यान, एफआरपी थकविणाºया कारखान्यांनी १५ टक्के व्याजासह शेतकºयांना पैसे देण्याबाबतच्या सांगोल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोरख घाडगे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार ऊस गाळपाला आणल्यानंतर १४ दिवसांत शेतकºयांचे पैसे देणे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बहुतेक कारखाने नियमाप्रमाणे शेतकºयांना पैसे देत नाहीत.>सहकार मंत्र्यांनी कायदा मोडलानियमानुसार उसाचे पैसे शेतकºयांना न देणाºया साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी त्या-त्या जिल्हाधिकाºयांना दिले होते. साखर आयुक्तांनी राज्यातील २२ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई सुरू असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकार नसताना कारवाईला स्थगिती दिल्याचा आरोप याचिकाकर्ते गोरख घाडगे यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर सहकारमंत्र्यांनी स्थगिती उठवली असल्याचे घाडगे म्हणाले.