शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

साखर कारखानदारीसाठी ‘गुजरात’ पॅटर्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:28 IST

‘गुजरात’प्रमाणेच महाराष्ट्रातही उसाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत देण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर : एकाच वेळी एफआरपीची रक्कम देण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता ‘गुजरात’प्रमाणेच महाराष्ट्रातही उसाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत देण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.शनिवारी राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. साखर दरात होणाºया चढ-उतारामुळे किमान आधारभूत दर देण्यासाठी सर्वच कारखान्यांना शक्य नसल्याने साखर कारखान्यांसमोर अडचणी येत आहेत. मागील वर्षीच्या गाळपाचे राज्यातील साखर कारखान्यांनी २२ हजार कोटींपैकी सध्या १७५ कोटी रुपये दिलेले नाहीत, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. एकूण एफआरपीपैकी अवघे ००.८६ टक्के रक्कम शेतकºयांचे देणे असून, ज्यांनी एफआरपी दिली नाही, त्यांना गाळप परवाने दिले जाणार नाहीत, असे देशमुख म्हणाले. गुजरातमध्ये उसाचे पैसे शेतकºयांना दोन-तीन टप्प्यांत दिले जातात, राज्यात एकाच टप्प्यांत पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे उपलब्ध होत नाहीत. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार एफआरपीची रक्कम एकाच टप्प्यात व ऊस गाळपाला आणल्यानंतर १४ दिवसांंत देणे बंधनकारक आहे. ही अडचण लक्षात घेऊन राज्यातही उसाचे पैसे देण्यासाठी तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. मागील वर्षीची शिल्लक साखर व यावर्षीचे उत्पादन पाहता कारखान्यांना थेट इथेनॉल निर्मिती करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. इथेनॉल विक्रीचे वाढलेले दर लक्षात घेऊन कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले.दरम्यान, एफआरपी थकविणाºया कारखान्यांनी १५ टक्के व्याजासह शेतकºयांना पैसे देण्याबाबतच्या सांगोल्याचे सामाजिक कार्यकर्ते गोरख घाडगे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार ऊस गाळपाला आणल्यानंतर १४ दिवसांत शेतकºयांचे पैसे देणे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र बहुतेक कारखाने नियमाप्रमाणे शेतकºयांना पैसे देत नाहीत.>सहकार मंत्र्यांनी कायदा मोडलानियमानुसार उसाचे पैसे शेतकºयांना न देणाºया साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी त्या-त्या जिल्हाधिकाºयांना दिले होते. साखर आयुक्तांनी राज्यातील २२ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई सुरू असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अधिकार नसताना कारवाईला स्थगिती दिल्याचा आरोप याचिकाकर्ते गोरख घाडगे यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर सहकारमंत्र्यांनी स्थगिती उठवली असल्याचे घाडगे म्हणाले.