शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पालकमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातो, कामे सूचवा, सहकारमंत्र्यांनी पाठविले सोलापुरातील नगरसेवकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:29 IST

राकेश कदम सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या भांडवली निधीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ...

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी निधी मिळालेला नाही पत्राने पालकमंत्री गटाचे नगरसेवकही गोंधळात पडले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या भांडवली निधीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे

राकेश कदम

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या भांडवली निधीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि बसपाच्या नगरसेवकांनी महापालिकेत भाजपा पदाधिकाºयांवर राजकीय टोलेबाजी करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन्ही गटाच्या नगरसेवकांकडून कामांचे प्रस्ताव मागितले आहेत. पालकमंत्र्यांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे जातो, असे त्यांनी नगरसेवकांना पाठविलेल्या नमूद केले आहे. या पत्राने पालकमंत्री गटाचे नगरसेवकही गोंधळात पडले आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी निधी मिळालेला नाही. आता लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न भाजपाचे नगरसेवक दोन देशमुखांकडे उपस्थित करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन्ही गटाच्या नगरसेवकांना पत्र पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसाठी कधीही हात आखडता घेतला नाही. 

शहरातील नियोजनपूर्वक कामांची आखणी करा. एकत्रितपणे निधी मागितल्यास मुख्यमंत्री दोनशे ते अडीचशे कोटी देतील. तुमचे प्रस्ताव घेऊन मी आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही देशमुखांनी म्हटले आहे.

 सहकारमंत्र्यांच्या या पत्रानंतर पालकमंत्री गटाचे नगरसेवक संभ्रमात आहेत. रविवारी दहशतवादाविरोधात धरणे आंदोलन झाल्यानंतर सहकार मंत्री देशमुख यांनी मागितलेल्या कामांचे प्रस्ताव द्यायचे की नाही याबद्दल पालकमंत्री गटात चर्चा सुरू होती. यापूर्वी १८ कोटींच्या निधीवरुन दोन्ही गटात धुसफुस झाली होती. 

भाजपावर निशाणा -  काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह सहा नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत भाजपाची कोंडी करणारा प्रस्ताव मांडला आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला एलबीटी अनुदानाचे ४८ कोटी रुपये येणे आहे. एलबीटी बंद झाल्यानंतर जीएसटी अनुदान सुरू झाले. जीएसटीचे दरमहा १८ कोटी ५० लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात १५ कोटी रुपये मिळत आहेत. दोन वर्षात जवळपास ७२ कोटी रुपये इतके अनुदान कमी आले आहे. एलबीटी आणि जीएसटी अनुदानाची १२० कोटी रुपये बाकी आहे. दोन वर्षांपासून कोणत्याही नगरसेवकांना निधी मिळालेला नाही. कोणतीही नागरी सुविधा पुरविण्यात नगरसेवक असमर्थ ठरले आहेत. शासनाने ही रक्कम त्वरित दिल्यास नगरसेवकांना निधी मिळेल.

- राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असूनही १२० कोटी रुपये मिळालेले नाहीत. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीचा ठराव फडणवीस सरकारला पाठवावा, अशी मागणी आम्ही केली आहे. या निधीबाबत गेल्या दोन वर्षात काय केले याचे उत्तर भाजपाच्या पदाधिकाºयांना सभागृहात द्यावे लागणार आहे, असे चेतन नरोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखPoliticsराजकारण