शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पालकमंत्र्याचे दुर्लक्ष; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा कारभार ‘प्रभारीं’वरच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 17:14 IST

चार उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदारांसह १३ नायब तहसीलदारांची पदे रिक्त

सोलापूर : जिल्ह्याचा प्रशासकीय गाडा हाकणार्‍या महसूल विभागाचा कारभार गेल्या अनेक महिन्यापासून प्रभारींवरच सुरू असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. यामुळे विकासकामांचा खेळखंडोबा सुरूच आहे. त्याशिवाय आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाही महसूलचा कारभार प्रभारींवरच हाकला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना अधिकारी? येण्यास उत्सुक नाहीत. याकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. चार उपजिल्हाधिकारी, चार तहसीलदार तसेच १३ नायब तहसीलदार पदे रिक्त आहेत. जिल्हा प्रशासनाला कोणी पूर्णवेळ अधिकारी? देता का अधिकारी? अशी म्हणण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी प्रभारींवर सोपवली आहे. महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे रोजगार हमी योजना व पंढरपूर प्रांताधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर रोजगार हमी योजनेसाठी किशोर पवार यांच्या बदलीनंतर अधिकारीच नियुक्त केला नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांच्या बदलीनंतर भूसंपादन अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडे पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दक्षिण सोलापूर व अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे भूसंपादन विभागाचा अतिरिक्त पदभार होता. आर्थिक देवाण-घेवाण प्रकरणावरून त्यांचे निलंबन झाले आहे. विभागीय पातळीवर त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांचेही पद सध्या रिक्त आहे. त्यांच्या जागेवर दुसरे कोणते अधिकारी येथील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. हे पद सध्या अन्नधान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्याकडे आहे.

भूसंपादन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांची बदली झाल्यानंतर त्या विभागाचा पदभार अरुणा गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. नगरपालिकांचे जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे यांचीही अकोला येथे बदली झाल्याने त्यांचाही पदभार पंढरपूर मुख्याधिकारी यांच्याकडे सोपवला आहे. अक्कलकोट नगरपालिकेसाठी पाच मुख्याधिकारी बदलण्यात आले आहेत तर इतर नगरपालिकेसाठी पूर्णवेळ मुख्याधिकार्‍यांची वानवाच आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे चिटणीस श्रीकांत पाटील यांची सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी पदावर बदली झाली असून, सध्या ते या पदावर रुजू झाले नाहीत. करमणूक विभागाचे तहसीलदार शिरसाट यांच्याकडे सोपविला आहे. याशिवाय सामान्य शाखा, कूळ कायदा, संजय गांधी निराधार योजना शाखेचा पदभार शिरसाट यांच्याकडेच आहे. चार उपजिल्हाधिकारी, पाच तहसीलदार तसेच १३ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यासोबत ११ तालुके व १२ नगरपालिका असलेल्या जिल्ह्यात अधिकारी येण्यास उत्सुक नाहीत. आता कोरोना लाट व इतर महसूल कामकाज सुरळीत चालण्यासाठी अधिकार्‍यांची गरज आहे. पण गेल्या सहा महिन्यांत रिक्त ठिकाणी अधिकारी रुजू होत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्री वारंवार बैठका घेतात, पण अधिकार्‍यांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.

प्रमुख पदेही रिक्तच

निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नवीन अधिकार्‍यांची नियुक्ती झाली नव्हती. या पदाची जबाबदारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माळशिरसचे प्रांताधिकारी शमा पवार यांची निवासी उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार यांना निवासी उपजिल्हाधिकारी पदावर रुजू होत आले नाही. त्यामुळे प्रभारी असलेले वाघमारे यांच्याकडे सध्या सदर पद कार्यरत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार