शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर सलामत तो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 16:18 IST

जमाल गोटा...राजकीय प्रवास...

  • (महाराष्ट्राच्या  राजकारणातील राजकीय गडबड-घोटाळ्याची  वार्ता कर्णोपकर्णी हस्तिनापूर नरेश धृतराष्ट्रच्या दरबारी पोहोचली. दररोजच्या घडामोडीने साºया दरबारात एकच कुजबूज.. महाराष्ट्रत नेमकं चाललंय तरी काय? महाराज धृतराष्ट्रच्या आगमनाची कोणालाच खबरबात नाही.)
  • धृतराष्ट्र : (चिडलेल्या अवस्थेतच) प्रधानजी काय चाललंय हे.  
  • प्रधानजी:  (सारेच उठून मुजरा करीत) क्षमा असावी महाराज! तिकडे महाराष्ट्र नामक राज्यात भलतीच धमाल सुरूय म्हणे.
  • धृतराष्ट्र : हो, पण त्याचा इथं काय संबंध? 
  • प्रधानजी : महाराज, महाराष्ट्रात खुर्चीसाठी साºयाच पक्षात बंडाळी माजलीय. अनेकांची शकले उडालीत.. ‘खुर्चीसाठी कायपण’ असा कोलांट उड्याचा खेळ सुरू झालाय. आपलं बूड शाबूत ठेवण्यासाठी सारा खटाटोप सुरूय. छप्पन इंच छातीचं अन् विदर्भाच्या वाघाच्या चाणक्य नितीनं उलथापालथ सुरु आहे. म्हणून ‘ सर सलामत तो...’ असंच काहीसं चित्र दिसू लागलंय... म्हणून म्हणतो तिथला  ‘आँखो देखा हाल’ आपल्याला कळला पाहिजे. दरबारातले खास विश्वासू, दिव्यदृष्टीफेम संजयांकडून समजला तर आपल्यालाही त्यांच्या नीतीचा लाभ होईल.
  • धृतराष्ट्र : (दाढी कुरवाळत) प्रधानजी आता समजलं, तुम्हाला काय म्हणायचंय ते. ( दिसत नसले तरी आजूबाजूला नजर टाकत) वत्सा संजया... कुठे आहेस तू?
  • संजय : (महाराजांना मुजरा करीत) प्रणाम महाराज!
  • धृतराष्ट्र: वत्सा, तुझ्या दिव्यदृष्टीने दर्शन घडव महाराष्टÑाचं.
  • संजय: (मान डोलावत) जशी आपली आज्ञा महाराज!
  • धृतराष्ट्र बोल, कुठून सुरुवात करतोस? 
  • संजय: महाराज, सोलापूर नामक जिल्ह्यातूनच सुरुवात करतो. (डोळे मिटत) महाराज, इथंतर साराच घोळ सुरू आहे. 
  • धृतराष्ट्र: म्हणजे रे काय?
  • संजय: समर्थाच्या नगरीत बरंच झांबल झांबल सुरुय. मिनतवारी करुनही हाती काही लागलं नाही शेवटी अण्णाला बॅक टू पॅव्हेलियन परतावं लागलं. इथं कोणाचा थांगपत्ता कोणाला लागेनासा झालाय. बिलंदर प्रजेलाही कोणाला वाट्याण्याच्या अक्षता लावायच्या याचं चांगलंच कसब आहे. सिद्धरामेश्वराच्या नगरीत  आता ‘कोठे’ जाऊ  ‘विजय’ साधण्यासाठी. फिल्डिंग कशी लावायची यासाठी कूटनीती वापरली जाऊ लागलीय. 
  • धृतराष्ट्र: सैराट नगरात वातावरण तापलंय म्हणे. 
  • संजय: हो बरोबराय महाराज. तिथंही सारं अस्थिर दिसतंय. आज एक तर उद्या दुसरीच खबर कानी येऊ लागलीय. कार्यकर्त्यांना कोणता झेंडा हाती घेऊ अशी स्थिती दिसतेय.  
  • धृतराष्ट्र: अरे वत्सा त्या पांडुरंगाच्या दरबारात काय चाललंय?
  • संजय: महाराज तिथलं तर काय विचारू नका, तिथं नानानं लंगोट बांधून कमळाच्या पाखळ्याशी सलगी करायचा चंग बांधला खरा; पण पुढचा तर टाईम साधावा म्हणून त्यांनी हातात घड्याळ बांधून घेतलंय. नाही नाही म्हणत थोरल्या पंतानं मात्र इथं बाजी मारलीय. आता रणांगनात कोणी बाजी मारतंय बघू.
  • धृतराष्ट्र: अन् मग बाकीचे टिव टिव करणारे कुठं गेले. 
  • संजय : बाकीचे ‘मनसे’ पूछ रहे हैं अब मैं क्या करु..
  • धृतराष्ट्र: अजून कुठं कुठं  काय चाललंय सांग बरं..
  • संजय: कुठलं कुठलं सांगू महाऽऽराज, साºयांना एकच चिंता लागून राहिलीय, भले आमदारकी नसू दे पण आहे ते कसं शाबूत ठेवायचं याची चिंता लागून राहिलीय. नसती इडा पिडा नको म्हणून सारा खटाटोप सुरूय.
  • धृतराष्ट्र : म्हणजे रे काय?
  • संजय: कमावलेलं सारं एका रात्रीत गमवू नये म्हणून खटाटोप.
  • धृतराष्ट्र : म्हणजे मी कौरवांना सारखं सांगतोय..पांडवांच्या नादी लागू नका, नाहीतर हाय ते गमावून बसाल, तसंच ना!
  • संजय: अगदी बरोबर बघा महाराज!
  • धृतराष्ट्र: झालं का? तुझं आणखी काय ? 
  • संजय: महाराज सांगायला अख्खी रात्र सरंल. मामा, अण्णा, दादा, मालक सारे बेरजेचं राजकारण करण्यात मश्गुल आहेत. सीनापट्ट्यात दादानं एकदाचा धनुष्यबाण पटकावलाय. डाळिंब पट्ट्यात बापू लंगोट बांधून तयार आहेत तर साह्येबांना पुन्हा गळ घालणं सुरूय. गावोगावचे मालकलोक  आपली मूठ कशी ताब्यात राहील याचाच विचार करू लागलेत... जाऊ द्या दुपार झालीय आता सर्वांच्या पोटात कावळे ओरडू लागलेत.. मगापासून राणीसाहेबांचा दोनदा आतून आवाज आलाय. बाकीचं पुन्हा बोलू यात. तूर्त एवढंच पुरं.
टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण