शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आजी-माजी आमदारांचा गट देतोय निकराची झुंज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:16 IST

शहाजी फुरडे-पाटील बार्शी : तालुक्यातील बावी (आगलावे) तसं पूर्वी संवेदनशील गाव; मात्र गेल्या काही वर्षांपासून शांत झाले आहे. गावाला ...

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी : तालुक्यातील बावी (आगलावे) तसं पूर्वी संवेदनशील गाव; मात्र गेल्या काही वर्षांपासून शांत झाले आहे. गावाला यंदा जिल्हा परिषदेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतीवर वीस वर्षांपासून आमदार राजेंद्र राऊत गटाची सत्ता आहे. त्यामुळे या काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आमचीच सत्ता येणार असा सत्ताधारी दावा करीत आहेत, तर दुसरीकडे सर्वाधिक काळ सत्ता असल्याने नाराजांची संख्या जास्त आहे. सत्ताधारी पारदर्शी कारभार करीत नाहीत, असा दावा करीत विरोधकांनी परिवर्तनाची हाक दिली आहे.

चुरशीने होत असलेल्या या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. गावात ११ सदस्यसंख्या असून, यापैकी सत्ताधारी गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. खंडोबा हे गावचं ग्रामदैवत. लोकवर्गणीतून गावकऱ्यांनी भव्य असे मंदिर बांधलेले आहे. सत्ताधारी गटाने ग्रामदैवत श्री खंडोबा विकास आघाडीच्या माध्यमातून दहा उमेदवार उभे केले आहेत. मेजर मच्छिंद्र फोपले, डॉ. लहू आगलावे, समाधान डोईफोडे, रवीदादा लोंढे, प्रताप मिठे, मधुकर आगलावे, रामचंद्र आगलावे, पिंटू लोंढे हे या आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.

गावातील दोन्ही गटांच्या तरुणांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. वीस वर्षांच्या काळात संपूर्ण गावात क्राँक्रीट रस्ते, पूर्ण गावात भुयारी गटारी, पाच अंगणवाड्यांना इमारती, मिनी अंगणवाडी, शाळेची दुरुस्ती, तालमीचे नूतनीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती, गावात सर्वत्र सौर व हायमास दिवे, स्मशानभूमीला सरक्षक भिंत, आदी सर्व विकासकामे केली आहेत. गावाला तलाव, तीन विहिरी, बोअर, आदी ११ स्रोतांच्या आधारे मुबलक पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर गावकरी आम्हाला संधी देतील, असे भाजपचे सरचिटणीस निवडणुकीतील उमेदवार पिंटू लोंढे म्हणतात.

तर विरोधी माजी आमदार सोपल गटाने खंडोबा महाविकास युवा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला आव्हान दिले आहे. हरिभाऊ पाटील, नागनाथ आगलावे, राहूल आगलावे, किरण आगलावे, संभाजी पाटील, गोकुळ आगलावे, भीमराव पाटील, गोवर्धन पाटील, अमोल झिंगे, दयानंद व अशोक लागलावे हे नेतृत्व करीत आहेत. गावात वीस वर्षे विरोधकांची सत्ता आहे. त्यांनी विकासकामे केली आहेत. मात्र, त्यात गुणवत्ता नाही. मनमानी सुरू आहे. गावात बसची सोय नाही. सत्तेच्या जोरावर ते आमच्या उमेदवारांवर दबाव आणतात. त्यामुळे आम्ही केवळ पारदर्शी कारभार हा मुद्दा घेऊन निवडणूक लढत आहोत. जास्त दिवस सत्ता असल्याने नाराजांची संख्या जास्त आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल, असे गजेंद्र उंबरे म्हणाले.

जिल्हा परिषद सदस्या डोईफोडे यांचा मुलगा समाधान डोईफोडे स्वत: निवडणूक लढवत आहेत. दोन्ही गटांनी अद्याप प्रचाराचा नारळ फोडला नसला, तरी गाठीभेटींवर भर दिला आहे. सोशल मीडिया व होम टू होम प्रचार सुरू आहे.

----

प्रचारातील मुद्दे - आम्ही वीस वर्षे सत्तेच्या बळावर गावात पायाभूत विकासाची सेवा दिली आहे. त्या बळावर आम्हाला जनता पुन्हा संधी देईल. जनतेचा विकास हाच आमच्या प्रचारातील मुद्दा असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

- गावात वीस वर्षे विरोधकांची सत्ता आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांत गुणवत्ता नाही. मनमानी सुरू आहे. गावात बसची सोय नाही. सत्तेच्या जोरावर ते आमच्या उमेदवारांवर दबाव आणतात. त्यामुळे आम्ही केवळ पारदर्शी कारभार हा मुद्दा घेऊन निवडणूक लढत आहोत.

-----

बावी ग्रामपंचायत

एकूण सदस्य - ११, एक जागा बिनविरोध

एकूण मतदार - २५६६,

प्रमुख लढत खंडोबा विकास आघाडी विरुद्ध खंडोबा युवा परिवर्तन आघाडी

-----