शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Good News; मिरजहून निघालेली ट्रेन लातूरला पोहोचणार अवघ्या साडेतीन तासात

By appasaheb.patil | Updated: February 12, 2021 13:25 IST

मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण

ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरूदौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्याला जोडणारा मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शी या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या ताशी ८० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावल्यास मिरजहून लातूरला पोहोचण्यात अवघे तीन ते साडेतीन तास लागणार आहेत.

मागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. रेल्वे विभागाने ४ ऑक्टोबर २०१८ रोजी मिरज-पंढरपूर- कुर्डुवाडी- बार्शी- उस्मानाबाद-लातूर या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामास सुरुवात केली. ३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या मार्गावर मिरज-लातूर, बीदर-कोल्हापूर, मिरज-परळी पॅसेजर, निझामाबाद-पंढरपूर पॅसेजर या गाड्या धावतात. गर्दी व प्रवाशांच्या मागणीचा विचार करता भविष्यात या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

मिरज-पंढरपूरची विद्युत चाचणी यशस्वीमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मिरज-पंढरपूर या १३२ किलोमीटर रेल्वेमार्गावर विद्युत चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. डिझेल इंजीनने मिरज-पंढरपूर प्रवासासाठी दोन तास लागतात मात्र विजेवर चालणारी रेल्वे गाडी सव्वातासात पंढरपूरला पोहोचली. 

तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणारमध्य रेल्वेच्या पुणे विभागात मिरज-कोल्हापूर या ४८ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. सोलापूर विभागात मिरज-कुर्डुवाडी रेल्वेमार्गावर पंढरपूरपर्यंत एकेरीमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या या विद्युत चाचणीमुळे कोल्हापूर-मिरज-पंढरपूर या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या नियमित सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूर या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. या कामामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. - शैलेश गुप्ता, विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेmiraj-acमिरजlaturलातूरOsmanabadउस्मानाबाद