शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

Good News; मिरजहून निघालेली ट्रेन लातूरला पोहोचणार अवघ्या साडेतीन तासात

By appasaheb.patil | Updated: February 12, 2021 13:25 IST

मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण

ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरूदौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्याला जोडणारा मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शी या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या ताशी ८० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावल्यास मिरजहून लातूरला पोहोचण्यात अवघे तीन ते साडेतीन तास लागणार आहेत.

मागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंत दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. रेल्वे विभागाने ४ ऑक्टोबर २०१८ रोजी मिरज-पंढरपूर- कुर्डुवाडी- बार्शी- उस्मानाबाद-लातूर या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण कामास सुरुवात केली. ३४२ किमीचे हे काम पूर्ण करण्यासाठी ३५२ कोटी ५८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या मार्गावर मिरज-लातूर, बीदर-कोल्हापूर, मिरज-परळी पॅसेजर, निझामाबाद-पंढरपूर पॅसेजर या गाड्या धावतात. गर्दी व प्रवाशांच्या मागणीचा विचार करता भविष्यात या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

मिरज-पंढरपूरची विद्युत चाचणी यशस्वीमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मिरज-पंढरपूर या १३२ किलोमीटर रेल्वेमार्गावर विद्युत चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. डिझेल इंजीनने मिरज-पंढरपूर प्रवासासाठी दोन तास लागतात मात्र विजेवर चालणारी रेल्वे गाडी सव्वातासात पंढरपूरला पोहोचली. 

तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणारमध्य रेल्वेच्या पुणे विभागात मिरज-कोल्हापूर या ४८ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. सोलापूर विभागात मिरज-कुर्डुवाडी रेल्वेमार्गावर पंढरपूरपर्यंत एकेरीमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या या विद्युत चाचणीमुळे कोल्हापूर-मिरज-पंढरपूर या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या नियमित सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूर या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दौंड ते वाडीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-बार्शीपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बार्शी ते उस्मानाबाद-लातूर रोडर्यंतचे काम मार्चअखेर पूर्ण होणार आहे. या कामामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. - शैलेश गुप्ता, विभागीय व्यवस्थापक, सोलापूर मंडल, मध्य रेल्वे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेmiraj-acमिरजlaturलातूरOsmanabadउस्मानाबाद