शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

Good News; सोलापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा दर १२ टक्क्यांनी खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 12:13 IST

चाचण्या घटल्या: मे महिन्यात झाले सर्वाधिक मृत्यू

सोलापूर: मागील पंधरवड्यात जिल्ह्याचा २६ टक्के असलेला पॉझिटिव्हचा दर आता १२.१९ टक्क्यांवर आला आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आलेख फेब्रुवारीनंतर वाढत गेला असला तरी तो मेच्या शेवटच्या आठवड्यात खाली येत आहे. मात्र, मे महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे १ हजार १२७ बळी गेले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट मार्चनंतर जिल्ह्यात वाढत गेल्याचे दिसून येत आहे. एप्रिल व २१ मेपर्यंत ही वाढ कायम राहिली. मात्र, त्यानंतर शहर व ग्रामीण भागातही संसर्ग कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. १३ मे रोजी जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा दर २०.५३ होता, तो पुन्हा १६ मे रोजी २६.५४ टक्क्यांवर गेला. त्यानंतर मात्र पॉझिटिव्हचा दर कमी कमी होत असल्याचे आशादायी चित्र दिसत आहे. जानेवारी महिन्यात ७२ हजार १०७ चाचण्यांत २ हजार ५४१ रुग्ण आढळले. केवळ ६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ४९ हजार ७४६ चाचण्यांत २ हजार २३ रुग्ण आढळले व ४२ जणांचा मृत्यू झाला. इथपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होता. पण, मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग भर्रकन वाढला. १ लाख १९ हजार ३६८ चाचण्यांत ८ हजार ७६१ रुग्ण पॉझिटिव्ह तर ११३ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात २ लाख ८५ हजार २०३ चाचण्यांत ३६ हजार २३६ जण पॉझिटिव्ह आढळले तर ७४० जणांचा मृत्यू झाला. २७ मे अखेर जिल्ह्यात २ लाख ६८ हजार ९३२ चाचण्या झाल्या. त्यात ४७ हजार ९२९ पॉझिटिव्ह तर १ हजार १२७ जणांचा मृत्यू झाला. मे महिन्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह व मृत्यू झाले असले तरी आता हळूहळू संसर्ग कमी होत असल्याचे चित्र आहे.

२१ ते २७ मे या सात दिवसांचा विचार केल्यास सोलापूर शहरात २६ जणांचा तर ग्रामीणमध्ये १८० जणांचा मृत्यू झाला. शहराचा मृत्यूदर ८.४ तर ग्रामीणचा २.३ टक्के आहे. गेल्या पंधरवड्याचा विचार करता २४ मे रोजी ६ हजार ८१० व २७ मे रोजी ७ हजार ७१४ अशा दोन दिवसांत चाचण्या कमी झाल्या आहेत; अन्यथा दररोज १० ते ११ हजार चाचण्या होत आहेत. शहरात पॉझिटिव्ह येण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे, तर ग्रामीणमध्ये हे प्रमाण गेल्या चार दिवसांपासून कमी होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल