शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पंचवीस हजाराचा विसर्ग

By रवींद्र देशमुख | Updated: October 1, 2023 16:36 IST

धरण ४० टक्क्यांच्या घरात

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून गेल्या दोन दिवसापासून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रविवारी दुपारी दौंड मधून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे २५ हजाराचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे धरणाची वाटचाल ४० टक्क्यांकडे सुरू झाली आहे.असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसात धरण ५० टक्के पार करणार आहे.

मागील तीन महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उजनी धरणात २० टक्क्याच्या आसपास पाणीसाठा होता. चार दिवसांपूर्वी २४ टक्क्यांवर थांबलेल्या धरणात आता झपाट्याने पाणी पातळी वाढत आहे. मागील तीन-चार दिवसात जवळपास पंधरा टक्के पाणी धरणात वाढले आहे. शनिवारी रात्री दौंडमधून जवळपास २० हजाराचा विसर्ग सुरू होता.

त्यात रविवारी सकाळी वाढ होऊन २२ टक्क्यांचा विसर्ग सुरू होता. पुन्हा दुपारी बारा वाजल्यापासून २५ हजार ८०० क्युसेकचा विसर्ग सध्या दौंडमधून उजनी धरणात सुरू आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत उजनी धरण ४० टक्के पार करेल, अशी आशा आहे. गेल्या तीन महिन्यापासून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरण