शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पंचवीस हजाराचा विसर्ग

By रवींद्र देशमुख | Updated: October 1, 2023 16:36 IST

धरण ४० टक्क्यांच्या घरात

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून गेल्या दोन दिवसापासून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रविवारी दुपारी दौंड मधून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे २५ हजाराचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे धरणाची वाटचाल ४० टक्क्यांकडे सुरू झाली आहे.असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन दिवसात धरण ५० टक्के पार करणार आहे.

मागील तीन महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उजनी धरणात २० टक्क्याच्या आसपास पाणीसाठा होता. चार दिवसांपूर्वी २४ टक्क्यांवर थांबलेल्या धरणात आता झपाट्याने पाणी पातळी वाढत आहे. मागील तीन-चार दिवसात जवळपास पंधरा टक्के पाणी धरणात वाढले आहे. शनिवारी रात्री दौंडमधून जवळपास २० हजाराचा विसर्ग सुरू होता.

त्यात रविवारी सकाळी वाढ होऊन २२ टक्क्यांचा विसर्ग सुरू होता. पुन्हा दुपारी बारा वाजल्यापासून २५ हजार ८०० क्युसेकचा विसर्ग सध्या दौंडमधून उजनी धरणात सुरू आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत उजनी धरण ४० टक्के पार करेल, अशी आशा आहे. गेल्या तीन महिन्यापासून चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरण