शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

GOOD NEWS; खाद्य तेलात दर कमी झाले अन् स्वयंपाकघराचे बजेट एकदम सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:39 IST

दिवाळीनंतर मागणी कमी; आयात शुल्क कपातीचा परिणाम

सोलापूर : मागील अनेक महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आवाक्याबाहेर गेलेले खाद्य तेलात दर कमी झाल्याने स्वयंपाकघराचे बजेट सुधारतांना दिसत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये सर्व खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १० ते ३५ रुपयांनी कमी झाले आहेत.

शेंगदाणा, सूर्यफूल आणि सरसो तेलाचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट काही प्रमाणात कमी झाले आहे. पुढील काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत तेल विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

तेलांचा दर (प्रति किलो)

 

                दिवाळीत        सध्या

सोयाबीन  १६०             १४०

शेंगदाणा  १६५             १५५

सरसो      १६०             १४८

सूर्यफूल  १९०             १६०

पाम         १४०             १२५

म्हणून झाले स्वस्त

केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले आले आहे. नवीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्याचाही परिणाम तेलाच्या घसरणीवर झाला आहे.

दर आणखी घसरणार

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. येणाऱ्या काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी सांगितले.

घाणा तेलाच्या मागणीत वाढ

नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्यात तयार केलेल्या तेलातील नैसर्गिक तत्त्व शरीराला मिळतात, यामुळे घाण्यावर तयार केलेली शेंगतेलास सर्वाधिक मागणी आहे.

पाच जणांच्या कुटुंबाने महिन्याला किती तेल खावे?

एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात रिफाइंड २०० ग्रॅम तेल वापरत असाल तर घेण्याचे तेल केवळ ७५ ग्रॅम वापरावे असे आहार तज्ज्ञांचे मत आहे. जेवणात तेलाचा वापर कमी केल्याने पैसे आणि आरोग्य यांची बचत होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प