शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

GOOD NEWS; खाद्य तेलात दर कमी झाले अन् स्वयंपाकघराचे बजेट एकदम सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:39 IST

दिवाळीनंतर मागणी कमी; आयात शुल्क कपातीचा परिणाम

सोलापूर : मागील अनेक महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आवाक्याबाहेर गेलेले खाद्य तेलात दर कमी झाल्याने स्वयंपाकघराचे बजेट सुधारतांना दिसत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये सर्व खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १० ते ३५ रुपयांनी कमी झाले आहेत.

शेंगदाणा, सूर्यफूल आणि सरसो तेलाचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट काही प्रमाणात कमी झाले आहे. पुढील काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत तेल विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

तेलांचा दर (प्रति किलो)

 

                दिवाळीत        सध्या

सोयाबीन  १६०             १४०

शेंगदाणा  १६५             १५५

सरसो      १६०             १४८

सूर्यफूल  १९०             १६०

पाम         १४०             १२५

म्हणून झाले स्वस्त

केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले आले आहे. नवीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्याचाही परिणाम तेलाच्या घसरणीवर झाला आहे.

दर आणखी घसरणार

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. येणाऱ्या काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी सांगितले.

घाणा तेलाच्या मागणीत वाढ

नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्यात तयार केलेल्या तेलातील नैसर्गिक तत्त्व शरीराला मिळतात, यामुळे घाण्यावर तयार केलेली शेंगतेलास सर्वाधिक मागणी आहे.

पाच जणांच्या कुटुंबाने महिन्याला किती तेल खावे?

एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात रिफाइंड २०० ग्रॅम तेल वापरत असाल तर घेण्याचे तेल केवळ ७५ ग्रॅम वापरावे असे आहार तज्ज्ञांचे मत आहे. जेवणात तेलाचा वापर कमी केल्याने पैसे आणि आरोग्य यांची बचत होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प