शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

GOOD NEWS; खाद्य तेलात दर कमी झाले अन् स्वयंपाकघराचे बजेट एकदम सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:39 IST

दिवाळीनंतर मागणी कमी; आयात शुल्क कपातीचा परिणाम

सोलापूर : मागील अनेक महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आवाक्याबाहेर गेलेले खाद्य तेलात दर कमी झाल्याने स्वयंपाकघराचे बजेट सुधारतांना दिसत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये सर्व खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १० ते ३५ रुपयांनी कमी झाले आहेत.

शेंगदाणा, सूर्यफूल आणि सरसो तेलाचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट काही प्रमाणात कमी झाले आहे. पुढील काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत तेल विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

तेलांचा दर (प्रति किलो)

 

                दिवाळीत        सध्या

सोयाबीन  १६०             १४०

शेंगदाणा  १६५             १५५

सरसो      १६०             १४८

सूर्यफूल  १९०             १६०

पाम         १४०             १२५

म्हणून झाले स्वस्त

केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले आले आहे. नवीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्याचाही परिणाम तेलाच्या घसरणीवर झाला आहे.

दर आणखी घसरणार

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. येणाऱ्या काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी सांगितले.

घाणा तेलाच्या मागणीत वाढ

नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्यात तयार केलेल्या तेलातील नैसर्गिक तत्त्व शरीराला मिळतात, यामुळे घाण्यावर तयार केलेली शेंगतेलास सर्वाधिक मागणी आहे.

पाच जणांच्या कुटुंबाने महिन्याला किती तेल खावे?

एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात रिफाइंड २०० ग्रॅम तेल वापरत असाल तर घेण्याचे तेल केवळ ७५ ग्रॅम वापरावे असे आहार तज्ज्ञांचे मत आहे. जेवणात तेलाचा वापर कमी केल्याने पैसे आणि आरोग्य यांची बचत होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प