शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

GOOD NEWS; खाद्य तेलात दर कमी झाले अन् स्वयंपाकघराचे बजेट एकदम सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:39 IST

दिवाळीनंतर मागणी कमी; आयात शुल्क कपातीचा परिणाम

सोलापूर : मागील अनेक महिन्यांपासून खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आवाक्याबाहेर गेलेले खाद्य तेलात दर कमी झाल्याने स्वयंपाकघराचे बजेट सुधारतांना दिसत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये सर्व खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलो १० ते ३५ रुपयांनी कमी झाले आहेत.

शेंगदाणा, सूर्यफूल आणि सरसो तेलाचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट काही प्रमाणात कमी झाले आहे. पुढील काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत तेल विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

तेलांचा दर (प्रति किलो)

 

                दिवाळीत        सध्या

सोयाबीन  १६०             १४०

शेंगदाणा  १६५             १५५

सरसो      १६०             १४८

सूर्यफूल  १९०             १६०

पाम         १४०             १२५

म्हणून झाले स्वस्त

केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली कपात आणि दिवाळीनंतर मागणीत झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले आले आहे. नवीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्याचाही परिणाम तेलाच्या घसरणीवर झाला आहे.

दर आणखी घसरणार

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढत असल्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. येणाऱ्या काळात सर्वच खाद्यतेल आणखी ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी सांगितले.

घाणा तेलाच्या मागणीत वाढ

नागरिक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाल्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिफाइंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्यात तयार केलेल्या तेलातील नैसर्गिक तत्त्व शरीराला मिळतात, यामुळे घाण्यावर तयार केलेली शेंगतेलास सर्वाधिक मागणी आहे.

पाच जणांच्या कुटुंबाने महिन्याला किती तेल खावे?

एका माणसाने दररोज १५-२० ग्रॅम तेलाचेच सेवन करावे, याप्रमाणे चार व्यक्तींच्या कुटुंबाला महिन्याला दोन किलो तेल पुरेसे ठरते. जर आपण आहारात रिफाइंड २०० ग्रॅम तेल वापरत असाल तर घेण्याचे तेल केवळ ७५ ग्रॅम वापरावे असे आहार तज्ज्ञांचे मत आहे. जेवणात तेलाचा वापर कमी केल्याने पैसे आणि आरोग्य यांची बचत होते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प