शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 16:14 IST

जाहिरातीची प्रतीक्षा : सैनिक बनण्याची संधी लवकर मिळाल्याचा आनंद

रवींद्र देशमुख

सोलापूर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात या शहराचा उल्लेख ‘शोलापूर’ असा केल्याची आठवण जुन्या पिढीतील लोक सांगतात. इथले शहरवासीय ऊर्जावान आहेत. निस्सिम देशभक्त आहेत. त्यामुळेच म्हणे पंडितजींनी असा उल्लेख केेला होता. देशासाठी ‘काही पण’ हे सोलापूरकरांच्या ‘डीएनए’मध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली काय अन् इथले ‘एनसीसी’चे कॅडेटस् तयारीलाही लागले.

सोलापुरात ‘एनसीसी’च्या दोन बटालियन्स आहेत. त्यांची मुख्यालयेही शहरातच आहेत; पण ‘एनसीसी’मार्फत अग्निपथमध्ये सामील होण्यासाठी मुलांना काही प्रोत्साहन दिले जाते काय, असे विचारले असता आम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले; पण काही कॅडेटशी संवाद साधला असता, त्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आम्ही तयारीला लागलो आहोत, असे सांगितले.

अक्कलकोट तालुक्यातील एक कॅडेट म्हणाला की, लष्करात सामील होण्याचं आमचं स्वप्न आहे. त्यासाठीच आम्ही ‘एनसीसी’मध्ये सामील झालो आहोत. आता इतक्या लहान वयात सैनिक व्हायला मिळत आहे, याचा मला आनंद आहे. अग्निपथ योजनेच्या पहिल्या योजनेमध्ये सहभागी व्हायला मिळावे यासाठी मी अथक परिश्रम घेणार आहे.

सोलापूरचा कॅडेट म्हणाला की, लष्कराच्या या योजनेचा विरोध का होतोय, हे ठाऊक नाही; पण माझ्यासाठी तरी ही संधी आहे. लहान वयात सैन्यात सहभागी व्हायला मिळते, याचा आनंद आहे. सैन्यातील चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पंचवीस टक्के अग्निवीरांना पुन्हा तेथेच काम करता येणार आहे. शिवाय जे बाहेर पडतील त्यांचे वयही कमी असल्याने नोकरीच्या संधी अनेक आहेत, असे त्याने सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ‘एनसीसी’चे लेफ्ट. जनरल गुरुबीरपालसिंग यांनी सांगितले होते की, अग्निपथ ही योजना आमच्या कॅडेटसाठी उत्तम संधी असून, ज्यांच्याकडे ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र आहे त्यांना भरतीमध्ये विशेष सवलत मिळणार आहे. देशाचे एक जबाबदार नागरिक घडविणे, हा ‘एनसीसी’चा प्रमुख उद्देश आहे आणि जे अग्निवीर म्हणून बाहेर पडतील, ते तर अधिक जबाबदार घडतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

--

एनसीसी प्रमाणपत्रांचा लाभ

ज्या कॅडेटस्ना ‘ए’ , ‘बी’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. त्यांना काही विशेष सवलती देण्यात येतात. ज्यांच्याकडे ‘ए’ प्रमाणपत्र आहे. त्यांना भरतीमधील सामान्य पद, सैनिक आणि ट्रेडस्मनच्या परीक्षेत पाच गुण दिले जातात. ‘बी’ प्रमाणपत्र असलेल्या कॅडेटस्ना वरील तीन पदांसाठी प्रत्येकी १० गुणांचा लाभ मिळतो. ज्यांच्याकडे ‘सी’ प्रमाणपत्र आहे, त्यांना सामान्य पद आणि ट्रेडस्मनची परीक्षा द्यावी लागणार नाही, तर सैनिक भरतीसाठी १५ बोनस गुणांचा लाभ होतो.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAgneepath Schemeअग्निपथ योजनाairforceहवाईदलindian air forceभारतीय हवाई दल