शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Good News; आठ वर्षांनंतर सोलापूर जिल्हा बँकेचा दर्जा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 12:30 IST

जळगाव, नाशिक जिल्हा बँका नापास; २०१३ मध्ये ''ड'' मध्ये गेलेली बँक आली ''ब'' श्रेणीत

सोलापूर : सशक्त असलेली जिल्हा बँक अशक्तच्या यादीत गेली ती प्रशासकांच्या सकारात्मक प्रयत्नातून बाहेर येत आहे. २०१३ मध्ये ''ड'' श्रेणीत गेलेली बँक आता ''ब'' श्रेणीत सामावली आहे. राज्यस्तरीय उच्चस्तरीय समितीच्या आढाव्यात नाशिक, जळगावसह इतर जिल्हा बँका नापास झाल्या मात्र एकमेव सोलापूर जिल्हा बँक पास झाली आहे.

राज्यातील सशक्त जिल्हा बंकांच्या यादीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश होता. मात्र चुकीच्या पद्धतीने बेसुमार वाटप केलेले कर्ज जसजसे थकत गेले तसतशी बँकेची आर्थिक स्थिती कोलमडली. संपूर्ण कर्जवाटत ठप्प झाले तसेच मोठमोठे कर्जदार संचालक व शेतकरी जिल्हा बँकेकडे येणेच बंद केले. आता बँकेचे भवितव्य कठीण आहे असे दिसू लागल्याने तत्कालीन राज्य सरकारने जिल्हा बॅंकेवर प्रशासक नियुक्त केले.

मागील तीन वर्षांत जिल्हा बँक हळूहळू पूर्व पदावर येत आहे. अशक्त असलेल्या बँकापैकी सोलापूर, नाशिक व जळगाव या जिल्हा बँका सशक्त करण्यासाठी २०१८-१९ मध्ये टर्न आरांट प्लॅन करण्यात आला होता. या प्लॅनप्रमाणे या तीन जिल्हा बँकांना आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचे आव्हान होते. यापैकी केवळ सोलापूर जिल्हा बँकेने हे आव्हान पेलले आहे. बँकेचा ६.५ टक्के घसरलेला सीआरएआर ९.४१ टक्के इतका झाला आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने २०१३ पासून ''ड'' वर्गात असलेली बँक मार्च २०२१ मध्ये ''ब'' वर्गात आली. उच्चस्तरीय समितीने सोलापूर जिल्हा बँकेचा आदर्श इतर जिल्हा बँकांनी घ्यावा, असे नमूद केले आहे.

ही आहे उच्चस्तरीय समिती..

  • रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक भागेश्वर बॅनर्जी, राज्याच्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक, सहकार खात्याचे सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे जी. एस. रावल व राज्य बँकेचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांचा समावेश असलेल्या उच्च स्तरीय समितीची आढावा सभा झाली. यामध्ये सीआरएआर, नफा व श्रेणीत सोलापूर जिल्हा बँकेने प्रगती केली असल्याचे नमूद केले आहे.
  • राज्यातील नागपूर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, धुळे-नंदुरबार व जळगाव या अशक्त बँका सशक्त करण्याचा प्रयत्न आहे. मात्र यामध्ये केवळ सोलापूर जिल्हा बँकेलाच यश आले आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकFarmerशेतकरीagricultureशेती