शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो ध्येय बाळगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:09 IST

नुकतेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले त्यामुळे साहजिकच शेवटी का होईना विद्यार्थी खडबडून जागे झाले आहेत. ...

ठळक मुद्देनुकतेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर साहजिकच शेवटी का होईना विद्यार्थी खडबडून जागे झाले मोबाईल व टीव्हीमधून थोडे डोके वर काढायला सुरुवात केलीय

नुकतेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले त्यामुळे साहजिकच शेवटी का होईना विद्यार्थी खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी मोबाईल व टीव्हीमधून थोडे डोके वर काढायला सुरुवात केलीय. प्रत्येकाला हवं हवंसं वाटणारं , प्रत्येकाचं हृदय हेलावून सोडणारं, प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारं हे विद्यार्थी जीवन असतं. याच विद्यार्थी जीवनात काही घटना कळत नकळत घडून जातात अन् त्या आठवणी मनात घर करून बसतात. त्या आठवल्या की मन मात्र वाºयासारखं भूतकाळाकडं ओढ घेतं. त्यावेळी मात्र मनाच्या झोपाळ्यावर विचाराचे हिंदोळे चालू असतात, विद्यार्थीदशेत  योग्य वेळ असते ती काहीतरी बनण्याची, करण्याची, इथूनच पुढच्या आयुष्याला दिशा मिळते. जीवनाला आकार प्राप्त होणार असतो.

आज प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी व्हावं, लोकांनी आपल्याकडे काहीतरी म्हणून पाहण्यापेक्षा विशेष काहीतरी म्हणून पाहावं व प्रत्येक जण हा उद्याच्या आशेवर जीवन जगत असतो. कारण प्रत्येकाचे जीवन म्हणजे ‘एक भिजलेल्या कागदा सारखे’ असते समोरचं दिसत नसते अन् मागचं पहावत नसतं म्हणून तर उद्याच्या आशेवर जीवन जगून पाहायचं असतं. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आशा-आकांक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण हव्यात अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.  प्रत्येक मनुष्य जन्मताच आशा-आकांशा घेऊन येतो असं  नाही. बालवयात फारशा कुणाच्याही मनात आशा निर्माण होत नाही.

पालक मुलांना शाळेत घालतात, का तर ते  घालतात म्हणून जायचे. ज्या वयात भरपूर खेळायचं बागडायचं त्या वयात अभ्यासाचा भार विद्यार्थ्यांना सहन होत नाही.  मुलं पुढे हायस्कूलला येतात ते वेगळे विषय, वेगळे शिक्षक त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात महत्त्वाकांक्षेला आकार मिळायला सुरुवात होते. त्याचवेळी स्वप्न पण रंगवायला सुरुवात होते. त्याचवेळी घरातील मंडळी तुला अमूक व्हायचंय! तुला तमूक व्हायचंय ! असं म्हणतात म्हणजे काहीतरी हो ही त्यांची धारणा असते; पण आज जर एका सामान्य विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की तुला पुढे होऊन काय व्हायचंय तर त्याने सहज सांगितले की  मला पंतप्रधान व्हायचंय ! खूप मोठे ध्येय छान पण जर पुढे पंतप्रधान होऊन तू काय करणार आहेस ? असा प्रश्न विचारल्यास पुढे बटाट्याचं दुकान टाकणार आहे, असं उत्तर मिळाले तर सगळ्यांना त्याच्या बुद्धीचे नवलच वाटेल.

मुलांना पालकांनी लादलेल्या अपेक्षा अजिबात आवडत नाहीत. स्वामी विवेकानंद व त्यांच्या वडिलांचा संवाद सुरु असताना त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला की मी काय होऊ? त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या त्यांच्या सारथी असलेल्या फोटोकडे हात करून सांगितले. ‘तू काही हो वेळप्रसंगी असे हो  पण, संपूर्ण देशात तुझं नाव व्हायला पाहिजे.’ त्या वेळेस त्यांनी दुसरा प्रश्न केला की ‘तुम्ही मला काय दिलेत’ यावर त्याचे वडील त्यांना आरशाकडे  घेऊन गेले आणि सांगितले हा मानवी देह मी तुला दिला आहे, तुला काय व्हायचे तू ठरव. याचा पण प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करावा. अवाढव्य अपेक्षामुळं मुलं अपयशी होतात. आपल्या मनातील महत्त्वाकांक्षेला दाबून ठेवतात. पालकांच्याअपेक्षा पोटी मुलाला आपल्या अपेक्षा महत्त्वाकांक्षा बदलाव्या लागतात. 

 महत्त्वाकांक्षेशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही हे पण तितकेच सत्य आहे.  त्यासाठी आत्मविश्वासाची साथ पाहिजे. कारण महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेथे एक हजर असतो तर दुसरा अगोदरच हजर असतो. आपल्या ध्येयावर प्रगाढ विश्वास आणि ती प्राप्त करण्याची प्रखर इच्छा असेल तर सारं काही साध्य होतं. प्रत्येक मनुष्य आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो.  त्यावेळी आपण कुठलेही काम करताना अडचणी येत असतात म्हणून नाराज होऊन त्यापासून पळू नका, दु:खी होऊ नका. कारण जीवन हे कबड्डी सारखं असतं.

अंगात जोपर्यंत दम आहे, तोपर्यंत योग्य ते कौशल्य वापरून गडी बाद करायचा असतो, उगीचच कबड्डी कबड्डी म्हणून आरडाओरडा करून काही निष्पन्न होत नाही. जीवनात सुख-दु:ख ही येतच असतात पण सुखाने मोहून जाऊ नका,दु:खाने खचून जाऊ नका. आपल्या पाठीशी अनुभवाची शिदोरी घेऊन चला कारण अनुभव हाच खरा शिक्षक असतो तो स्वत: परीक्षा घेत असतो आणि मगच शिकवत असतो. तुम्ही  काही का होईना ध्येय नक्कीच बाळगा मग ते कोणतेही असो. नक्कीच यशस्वी व्हाल !- हेमंत निंबर्गी(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूरexamपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८