शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

‘विठ्ठला’ कृषी कायदे रद्द करण्याची मोदी सरकारला सद्बुद्धी दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सत्ताधारी पक्षामार्फत पसरविण्यात येणाऱ्या भ्रमाची पोलखोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने राज्यभरात पोलखोल यात्रेचे आयोजन केले ...

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सत्ताधारी पक्षामार्फत पसरविण्यात येणाऱ्या भ्रमाची पोलखोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने राज्यभरात पोलखोल यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेची सुरुवात पुणतांबा येथून झाली. ही यात्रा मंगळवारी पंढरपुरात पोहोचली. यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातली. यादरम्यान संदीप गिड्डे हे पत्रकारांशी होते.

गिड्डे म्हणाले की, या यात्रेच्या माध्यमातून केंद्राचे कृषी कायदे कसे शेतकरीविरोधी आहेत, याची वाड्या-वस्त्यांवर जाऊन माहिती दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शेतकरी अथवा केंद्र सरकार गेले नाही. न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अदखलपात्र आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत घरवापसी नाही, असा पुनरुच्चार संयुक्त किसान मोर्चाचे संदीप गिड्डे यांनी केला.

यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाचे शंकर दरेकर, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण वंगे, अरुण कानोरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळणवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, राष्ट्रवादीचे संदीप मांडवे उपस्थित होते.

महाराष्ट्रात लोण पोहोचलंय...

दिल्लीत केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेली ४९ दिवस झाले आंदोलन करत आहेत. याचे लोण आता महाराष्ट्रात देखील पोहोचलंय. मोदी सरकारच्या कृषी कायद्याची पोलखोल करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने ‘पोलखोल यात्रा’ सुरू केली आहे.

फोटो ::::::::::::: १२पंड०१

संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्र पोलखोल यात्रा पंढरीत आल्यानंतर कृषी कायद्याला विरोध दर्शवताना पदाधिकारी. (छाया : सचिन कांबळे)